Friday, March 23, 2007

सात्विक संताप

ऑफिस मध्ये रोज कितीतरी फॉरवर्ड मेल्स येत असतात...सगळं काहि मी बघतेच असं नाही. काहिकाहि लोक तर इतके फॉरवर्डस पाठवतात कि अशा लोकांसाठी एक rule लिहावासा वाटतो. पण न जाणो खरंच एखादी चांगली मेल आली अशा व्यक्तीकडून तर आपली miss नको व्हायला असा विचार करून मी कोण्या एका मेलच्या प्रतिक्षेत अशा १०० मेल्स सहन करून शहाण्या मुलीसारखी डिलीट करते.
आजहि अशाच एका व्यक्तीकडून एक मेल (खरंतर अनेक, पण त्यातली हि एक) आली. सवयीप्रमाणे डिलीट करणार इतक्यात त्यातल्या subject ने लक्ष वेधले गेले. subject होता - Let's salute these officers.....today....and year after year......we are enjoying freedom because of them only.....
बघू तरी मेल म्हणून ओपन केली. त्यातला मजकूर हा असा होता -
Today is 23rd March.
The day to be remembered as today is their 75th death anniversary...
We must salute these brave officers today also who sacrificed their lives for us only.
For our INDEPENDENCE only...
Sahidon ki chitaaoo pe lagenge har baras mele, Watan per marne waloon ka bas yahi baaki nishan hoga… (Bhagat Singh)


आज २३ मार्च आहे हे सकाळी लक्षात आलं होतं....माझी जाम चिडचिड झाली ते The day to be remembered as today is their 75th death anniversary हे वाचून.
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांना २३ मार्च १९३१ साली इंग्रज सरकारने फाशी दिले. आज या गोष्टीला ७६ वर्षे झाली, ७५ नाही. प्रखर विचारांचे भगतसिंग यांच्या फाशीने उभा देश हेलावला होता. २३ वर्षाच्या या मुलाने जे मतप्रदर्शन, जनजागरण केले होते ते तोंडात बोट घालायला लावणारे आहे. आपल्याच देशातील काहि महान नेत्यांनी भगतसिंगांवर कडाडून टिका केली होती. असे असतानाहि आज देशभराच्या सगळ्या शालेय पाठ्यक्रमाच्या इतिहासात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या त्रयीचा स्वतंत्र उल्लेख आहे. २३ मार्च १९३१ पासून आजतागायत त्यांच्या बलिदानाला आम्ही "शहीद" म्हटले आहे. हे सगळं काय केवळ शाळेत गुण मिळवण्यापुरतं??
तेजस्वी क्रांतिकारकांच्या रक्ताची हिच किंमत करते आमची पिढी?? अमिताभ, राणी मुखर्जी, शाहरूख खान यांचे वाढदिवस मुखोद्गत असतील पण भगतसिंगांना फाशी झाली तो दिवस, जो आमच्या स्वातंत्र्यलढ्यातला महत्वाचा दिवस आहे तो लक्षात राहत नाही. इतके casual केलंय आम्हाला स्वातंत्र्याने??
प्रत्येकाची गती वेगवेगळ्या क्षेत्रात असते, सगळं लक्षात ठेवणे वस्तुत: शक्य नाही हे मलाहि मान्य आहे. मी स्वत: कित्येक महत्वाचे दिवस, घटना विसरते. पण एखादि मेल ज्यात ऐतिहासिक किंवा इतर महत्त्वाचे काहि आहे असे आपण जेव्हा इतर १५-२० लोकांना वाचायला फॉरवर्ड करतो तेव्हा एकदाहि तपशीलात जायची गरज वाटत नाही??? तुमचा जन्मदिवस समजा एका वर्षाने कोणी पुढे मागे केला तर काय प्रतिक्रिया असेल?? तुम्ही तर असे कोण ज्यांच्या बाबतीत लोक लक्षात ठेवतील... पण भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी देशासाठी प्राणार्पण केले आहे, त्याची निदान दिवस लक्षात ठेवून तरी चाड ठेवा. आजच्या पिढीला केवळ पूर्ण आयुष्य देशात घालवा असं म्हणलं तरी त्रास होईल, जीव देणं तर लांबच!!!

खूप चिडचिड होते माझी, संताप होतो.... कि काय होतंय, काय होणार आहे??

5 comments:

Sneha Kulkarni said...

खरं आहे अगदी!

कोहम said...

ek deerhga shwas ghyava ani tyachyasarashi sagala raag sodun dyava......ragavun kahihi honar nahi....tumachya amachyasarakhe lok vadhatil tevach improvement hoil....kasa? kadhi? dont know

HAREKRISHNAJI said...

खर आहे. काळाचा महिमा आणखी काय ? परिक्षेत "शिवाजी महाराजांचे गुरु कोण " ह्याला दादा कोंडके हे ऊत्तर दिले जाते.
फार पुर्वी मी अलिबाग मधिल कान्होजी आंग्रे ह्यांचा पडिक अवस्थेतील समाधिबद्द्ल वर्तमानपत्रात खुप लिहिले होते पण परिणाम शुन्य.

HAREKRISHNAJI said...
This comment has been removed by the author.
HAREKRISHNAJI said...
This comment has been removed by the author.