Sunday, January 28, 2007

यांना रस्ता दाखवा

२६ जानेवारी २००७, प्रजासत्ताक दिन, यंदा शुक्रवारी आल्याने माझ्यासारख्या key board बडवणार्या पामरांना long weekend मिळाला. एरवी अशा long weekend चे बेत मी आधीच केलेले असतात..पण या वेळी onsite जावं लागणार कि नाही या झुलत्या पुलामुळे काहिही बेत केला नव्हता. आणि आयत्यावेळी कुठेहि बुकिंग मिळाले नाही. म्हणून मग पुण्यात राहूनच जमेल तसा TP करण्याचे ठरवले. या निमित्ताने पुण्यनगरीतील अनेक जुन्या नवीन वास्तु, पावसाळा-हिवाळा संपून उन्हाळा तोंडावर आला तरी रस्त्यांची दुर्दशा, मनपा निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर पुढार्यांची भाषणे असे बरेच काहि अनुभवायला मिळाले.
२६ तारखेला हुरडा खायला गेले. तसा हुरड्याचा हंगाम संपत आला पण म्हणलं जाउन बघु :) आळंदि रोड वर 'गोखले मळा' आहे..तिकडे गेले. जाताना कर्वे रोड, F C, JM रोड, संगम पूल, बंडगार्डन, विश्रांतवाडि असे पुणे दर्शन करत पोहोचलो. यातला जवळ जवळ ३०% रस्ता हा अनेक छोट्या खड्ड्यांनी भरला होता, २०% रस्ता PMT चे थांबे, बस ची वाट बघणारे लोक, parking इ. मुळे व्यापला होता. १५% रस्त्यावर concrete च्या नवीन रस्त्याचे काम चालू... म्हणजे राहता राहिला ३५% रस्ता. यातहि रिक्षवाले, बेफ़ाम दुचाकि यांना प्राधान्य!!! पण हे सगळे आपल्या इतके अंगवळणी पडले आहे कि लोकांनी या ३५% च समाधान मानावे. शाळेपासूनच आपल्याला ३५ चे महत्त्व!!! मायबाप सरकार तरी कसे अपवाद असेल याला? ३५% आहे ना...मग पास च आहे कि :)
२७ तारखेला आईसोबत खरेदिचा योग आला. उन्हाचा त्रास नको म्हणून रिक्षेनेच निघालो. या रिक्षावाल्यांचे driving skill अफ़ाट असते. signal ला कुठल्या गाडिच्या मागे थांबणे म्हण्जे यांना अपमान वाटत असावा!!! बरं, कार म्हणू नका, बस म्हणू नका..हे बिनधास्त कोणाला कसेहि overtake करू शकतात. दरवर्षी श्रावणात सत्यनारायणाची पूजा केली कि यांचे वर्षभरातले driving चे अपराध देव माफ करत असावा.
खरेदिचे ठिकाण नेहमीचेच.. लक्ष्मी रोड!!! असंच इकडे तिकडे बघत चालले होते. PNG कडे शोकेस मध्ये लावलेला १ हार बघण्यासाठी थांबले तर १ पाय खड्ड्यात!!! खाली बघते तर एखाद्या खंदकाचा भाऊ शोभेल असा खड्डा. मनात आलं हार नुसता बघण्यासाठी मला खड्ड्यात जावं लागतंय तर.....
२८ तारखेला एका मित्राकडे वास्तुशांतीला जायचं होतं. त्याचं घर बाणेर-बालेवडी च्या मध्ये.... घरी दादाला कार हवी होती म्हणून मी माझी दुचाकि काढली. बर्याच दिवसांनी मी असं सलग १५-१८ कि.मी. दुचाकि चालवणार होते. पावसाळ्यात जिथे खड्डे पडले होते तिथे मायबाप सरकारने भर टाकून speed breaker सद्रुश उंचवटे केले आहेत. यावरून गाडि चालवायची तर कुठलाहि पुणेकर दुचाकि चालक motocross मध्ये भाग घेऊ शकतो. सामान्य जनतेला 'श्याम कोठारी' होण्याची स्वप्ने दाखवणारे सरकार किती ते महान!!! काहि रस्त्यांवर नव्याने खड्डे आहेत.... हे खड्डे चुकवून पुढे जाता न जाता तोच रस्त्यावर बारिक खडि असते. तुम्ही जर नवशिके असाल किंवा थोडेसे गाफिल असाल तर या खडीवरून हमखास घसरणार. आत असं पाहा, यात समाजाचा सर्वांगीण विकास आहे. तुम्ही पडलात तर -
१. तुम्हाला लागेल. पर्यायी doctor ला पैसे मिळतील.
२. गाडीला लागेल. mechanic साठी रोजगार निर्माण झाला.
३. तुम्ही हेल्मेट घातले नसेल तर तुम्हाला त्याचे महत्त्व पटेल नि ते खरेदि कराल.
४. पुढच्या वेळेपासून तुम्ही अधिक जबाबदारिने गाडि चालवाल.

रस्त्यात थोडीशी खडी टाकून सरकारने किती दूरदृष्टी ठेवली आहे बघा!!!

आता हे सगळे ज्या सरकारने तुम्हा-आम्हा साठी केले... त्यांनी कधी भावनाविवश होऊन म्हटले कि 'मी म्हणजेच पुणे' तर काय बिघडलं हो?

आणि जर बिघडलं असं वाट्तं असेल तर या सत्ताधायांना रस्ता दाखवा!!!

Wednesday, January 17, 2007

प्रेमरोग - चूक कोणाची??

साधारण २ आठवड्यांपूर्वी दुपारी जेवताना तिने आम्हाला तिच्या लग्नाची बातमी दिली. तिचं लग्न ठरलं होतं येत्या महिन्यात. हे सगळं सांगताना जाम खूष दिसत होती :) . लग्न कोणाशी होणार याची आम्हा सगळ्यांनाच कल्पना होती. ती माझी आधीच्या office मधली मैत्रीण.. मैत्रीण पे़क्शा collegue म्हणू. तिच्याच टिम मधला तो एक. office मध्ये त्यांच्या बद्दल खूप gossip चालायचं. पण त्यांचं वागणं कधीच आम्हाला awkward वाटलं नाहि. छान परिपक्व वाटायचे. मी इथे join झाल्यावर थोड्याच दिवसात मी तिला इथे refer केलं आणि ती इकडे join झाली. तेव्हापासून आमची मैत्री झाली.

तिने लग्नाची बातमी दिल्यापासून मी तिला officially चिडवायला सुरूवात केली होती. अगदि सुरू कधी झालं, propose कोणी केलं पासून HM कुठे जाणार पर्यंत सगळे details विचारून झाले माझे. :) बोलता बोलता कळलं कि तिच्या घरून विरोध आहे...जबरदस्त!!! कारण तेच पुरातन... तो सिंधी आहे. एवढं एक वगळता त्या मुलामध्ये नाकारण्याचं खरच काहि कारण नाही. पण अपेक्शाभंगाच्या दु:खापुढे सगळं च कस्पटासमान असतं. जावई आपल्या जातीतला असावा ही त्यांच्या द्रुष्टिने माफ़क अपेक्शा..जिचा भंग ते सहन करू शकत नव्हते. शिवाय समाज, प्रतिष्टा.. मुलीवरचे संस्कार हे सगळं pressure असेलच.

आम्ही तिला समजावत होतो कि हळूहळू ठीक होईल सगळं.. आई बाबांचा राग निवळेल!!! positive विचार करून तिने पण लग्नाची तयारी चालू केली. खरेदि झाली, hall booking झालं. अगदि आमची spinster's party पण झाली. तिचे आई बाबा अजून त्यांच्या मताशी ठाम होते.

परवा १ दिवस ती Office ला आली नाही. आमचे इथे तर्क चालू... कि madam चे shopping चालू असेल वगैरे :) दुसया दिवशी ती आली कधी हे कळलं नाही. आल्यावर direct email च. मेल मध्ये पण १ च वाक्य... "I want to talk to you...can u join me for T". मी गेले.

"काय madam, काल दांडी अचानक? क्या बात है??" माझा मिष्किल प्रश्न.
ती एकदम गंभीर....
"काय झालं ग?" मी
"My marriage is called off".........
"काय??? अगं postpone झालं का?" तिच्या called off या शब्दांवर माझा विश्वासच बसत नव्हता.
"नाही. cancel झालंय. आपण नंतर बोलु. पण आपल्या group मध्ये सगळ्यांना सांगायची शक्ती माझ्यात नाही. can u do it for me? please.."
मला काहि कळतच नव्हतं. हा काय प्रकार आहे? मी तिला "बरं" म्हणून जागेवर आले.

जमेल तसं सगळ्या group ला हा प्रकार सांगितला... सगळेच माझ्यासारखे हादरले होते. आज या गोष्टीला २ दिवस झाले. ती अजून त्या विषयावर माझ्याशी बोलली नाहिये. मी पण काहि विषय काढत नाहिये. ती शक्य तितकं normal राहण्याचा प्रयत्न करतेय. कौतुक वाटतं. तिचा विचार करून माझ्याच पोटात कसंतरी होतं... तिला काय होत असेल? काल पर्यंत ज्या माणसाबरोबर राहण्याची स्वप्न बघितली...तो आता नाही येणारे आयुष्यात?? कसं सहन करत असेल ती हे सगळं???? नक्कि कारण काय ते अजूनहि मला माहित नाही... पण एक नक्कि कि त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर. मग असं का व्हावं???

मी तयार करते आहे स्वत:ला... ती जेव्हा माझ्याशी बोलायला येईल..तेव्हा मी तिला धीर कसा देउ? काय सांगू?? मी हे काम आधीहि १-२ मैत्रीणींसाठी केलं आहे.. पण ते वेगळं होतं. तिथे प्रेम म्हणजे gangrin होता, जो कापल्याशिवाय पर्याय नव्हता. कापला नसता तर त्रास झाला असता. मी तो कापवा लाग्णार यासाठी मानसिक तयारी करून घेतली आणि कापताना वेदना कमी होतील हे बघितलं होतं. आता ...आता काय करायचं आहे मला? कळत नाही. हे लिहिता लिहिता मला सरस्वतीचंद्र मधलं हे गाणं आठवतंय...
"छोड दे सारी दुनिया किसि के लिये
ये मुनासिब नहीं आदमी के लिये
प्यार से भी जरूरी कई काम है
प्यार सबकुछ नहिं जिंदगी के लिये.."

पण मला अजून हि वाटतं, कि त्या दोघांनी परत एकत्र यावं...तिच्या आई बाबांनी हसत हसत आशीर्वाद द्यावा....
आणि माझा पुढचा blog.."They happily lived ever after..." असा असावा...