Wednesday, September 27, 2006

लक्श्मणरेषा..

सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्श्मण यांचे हे अनुवादित आत्मचरित्र. अनुवाद केला आहे अशोक जैन यांनी. आपण साधारण जी चरित्रे वाचतो ती लोकं खूप कष्टातून, झगडून वर आलेली असतात आणि यशस्वी होतात. लक्श्मणांच्या बाबतीत तस.न काहिहि नाहिये. त्यांचे वडिल इंग्रजांच्या काळात एका शाळेचे मुख्यध्यापक होते.. इतरांपेक्शा जरा जास्त सुखी बालपण लक्श्मणांनी उपभोगलं. हातात कला होतीच आणि घरच्या सधन परिस्थितीमुळे चौकटीतल्या क्शेत्रातल्या नोकरीची तशी आवश्यकताहि नव्हती. चित्रकलेतच करियर करायचं असं ठरलेलं होतं. सुरुवातीच्या काळात दिल्ली मध्ये प्रयत्न केले, पण एकूणच ते शहर फारसे भावले नाही तेन्व्हा मुंबई ला आले आणि थोड्या प्रयत्नांती टाईम्स ऒफ इंडिया मध्ये काम मिळाले. त्यानंतर या माणसाने अक्शरश: इतके सुख उपभोगले कि हेवा वाटावा. वृत्तपत्र ऒफिसात स्वतंत्र केबिन असणारा हा भारतातला पहिला व्यंगचित्रकार!!! यू सेड इट ने इतकि अभूतपूर्व लोकप्रियता मिळवली कि बास!!! अतिशय सूक्श्म निरिक्शण शक्ती, राजकिय घडामोडिंचा तटस्थ अभ्यास आणि हातातील जादुई कला याने या माणसाने ५ दशके भारतीय राजकियत्वावर मल्लीनाथी केली. हे काम इतकं मोठं कि याची दखल मगसेसे पुरस्कर्त्यांनी घेतली...हे पुस्तक वाचताना एक मात्र खटकतं...इतर अनेक व्यंगचित्रकारांचा यात उल्लेख आहे पण १-२ अभाव वगळता लक्श्मण कोणाबद्दलहि फारसं चांगले बोलत नाही. प्रत्येकात काहितरी खोट दाखवली आहे. एकूण चैनी, विलासी आयुष्य जगलेला हा माणूस... स्वत:मधल्या काहिशा वेगळ्या कलेमुळे अफाट लोकप्रियता पण अनुभवली... त्यांच्या ५ दशकाच्या मल्लीनाथी ला सलाम!!!
हे पुस्तक एकदा वाचण्यासारखे नक्कि आहे....

Tuesday, September 05, 2006

अनंत चतुर्दशी....

आज अनंत चतुर्दशी!!! गणपती बाप्पा आज परत जाणार.. एरवी अगदी शांत सरळ असलेल्या पुणेकरांमध्ये आजच्या दिवशी एकदम उत्साह दिसतो. ढोल, ताशा, लेझीम याच्या आवाजाने शहर अगदी दणाणून जाते. निरनिराळ्या शाळांची पथक, सुंदर रोषणाई... आजची रात्र पण दिवसापे़आ जास्त जिवंत असते.
पण मला गेले अनेक वर्ष एक प्रश्न पडतो आहे. अनंत चतुर्दशी म्हणजे खर.न तर बाप्पा ला या वर्षी पुरता निरोप द्यायचा दिवस... आपण कितीहि म्हणलं कि पुढच्या वर्षी लवकर या तरी तो यायचा तेव्हाच येणार.. मग निरोपाच्या दिवशी इतकि धामधूम का? ढोल, लेझीम... नाच, गाणी हे तर खरं गणेश चतुर्थी ला पाहिजे ना!!! कारण तो जास्त आनंदाचा दिवस.. बापा आला...आपल्या सगळ्यात दहा दिवस राहणार.. मग असं असताना सार्वजनिक मिरवणूक शेवटच्या दिवशी का?

Monday, September 04, 2006

अर्ध्या तपानंतर...

४ सप्टें २००६... खर्‍या अर्थाने करीयर सुरू करून ६ वर्ष झाली... म्हणजे अर्ध तप.. किती बदल झाले ६ वर्षात? माझ्यात आणि IT क्षेत्रातही...

कँपस मधून जिथे select झाले होते ती कंपनी R&D center असल्याने Pune office बंद करणार होती... मग दुसरी कडे शोधाशोध चालू झाली. freshers साठी out of campus interview हे जरा कठीण काम असतं. जरा एक दिड महिना हातपाय हलवल्यावर एका छोट्या कंपनी मध्ये join झाले... तारीख होती ४ सप्टें २००० त्यावेळी जावा बर्‍यापैकी नवीन होतं आणि microsoft ने IT क्षेत्र काबीज केलेलं होतं. प्रवाहापरमाणे मी पण VC++, COM, DCOM मध्ये काम करू लागले. जाम धमाल यायची. मझ्या lead चे MFC claases तोंडपाठ होते मी आपली MSDN वर च विसंबून होते. MSDN चा किती अधार वाटयचा तेंव्हा. आतासारखे टाक google ला query असा प्रकार तेंव्हा करत नसे मी. आणि google पेक्षाही altavista जास्त वापरत असत लोक. एक तर internet चे पण फ़ारसे प्रस्थ नव्हते.. साहजिकच firewall हा प्रकार हि मोठ्या कंपन्यांपुरता मर्यादित होता.. सुदैवाने अमच्याकाडे firewall नव्हती... सगळ्या web sites open होत्या... काय काय surf करयचो आम्ही... office मध्ये जवळ पास सगळेच जण २२ ते २८-३० च्या मधले... दंगा करायचू खूप. पैसे कमी मिळायचे पण काम करायला मजा यायची. काहिही झालं तरी कंपनी ला शिव्या घालायच्या हा एक कलमी कार्यक्रम असे. त्याशिवाय एकहि दिवस जात नसे . :)

२००० मध्ये करीयर सुरू झाल्याने 9/11 ची मी झळ सोसलेली आहे. IT job market was never that bad before... कल्पनेपेक्षाही भयानक परिणाम सोसले तेंव्हा IT ने. २००१ आणि २००२ हे पूर्णपणे ले ऑफ चे दिवस होते असं म्हणलं तर अतिशयोक्ती होऊ नये. मोठ्या कंपन्या तर सोडाच.. पण माझी कंपनी जिथे आम्ही जेमतेम ४० लोक होतो... तिथे हि ३ बॅच मध्ये ले ऑफ केला गेला. ज्याच्या बरोबर आपण काम केलं त्याला कंपनीने असं हाकलून देताना बघताना खूप त्रास व्हयचा. पण बघत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. नवीन नोकरी मिळवणे हि तितकेच अवघड होते. आहे ती नोकरी सांभाळने हेच एक आव्हान होऊन बसले होते. US, UK मधून हि लोक परत येत होते. IT चा फुगा जोरात फुटला होता. campus recruitment, increments, onsite opportunities सगळचं मंदावलं होतं. जावा वाल्या लोकांनी खूप वाईट दिवस बघितले या काळात. microsoft वाले फार सुखात होते असं नाही पण त्यातल्या त्यात बरं चालू होतं. गेले ते दिन गेले!!!

२००२ च्या शेवटी job market सुधारायला सुरूवात झाली. काही MNCs नव्याने देशात येऊ लागल्या... २००३ मध्ये IT क्षेत्राने जणू कात च टाकली. दिवस पाळटले. पूर्वीइतकं नाही पण job opportunities वाढल्या. काहि कंपन्या aggresive recruitment करू लागल्या. याच काळात मग मी पण job बदलला... मी जेंव्हा आताच्या freshers ना बोलताना बघते.. तेंव्हा मला इतका बदल जाणवतो... अम्ही करीयर च्या सुरूवातीला कधीच salary, onsite या बाबतीत इतके आग्रही नव्हतो. हसत खेळत काम करणे आणि क.म्पनीला जमेल तेंव्हा आनि तितकं नावे ठेवण.म यातच काय ते आमचं सुख!!! पण त्या नावे ठ्वण्यातहि एक मजा होती. कमी पैशात सुख होतं. आता पैसे जास्त मिळतात पण तशी मजा येत नाही. कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है!!

गेल्या सहा वर्षात IT ने चांगले आणि वाईट दिवस बघितले... यापुढे या क्षेत्राला चांगलेच दिवस बघयला मिळोत... आणि अमचे भले होवो. :)