"काय करणार weekend ला?" मी काल एका मित्राला विचारलं
"काही नाही गं. झोपणार आहे :)" तो तसा प्रामाणिक च!
"हम्म, बरोबर आहे. office ची सवय अशी घरी मोडवत नसेल."
"अगदी अगदी.... घरी ८ तास, बस मधले २ तास आणि office मधले ४-५ तास..इतकी झोप हवीच ना. शिवाय IT मध्ये सध्या recession मुळे किती ते tension. त्यामुळे तर झोपेची गरज वाढलीच आहे. लोकांची tension मुळे भूक वाढते ना, तशी माझी झोप वाढलीये बघ :)"
लहानपणा पासून एकमेकांना खेचण्याची कला आम्ही अगदी मनापासून जोपासली आहे. आणि आमचा ग्रुप म्हणजे अगदी कुंभकर्णाचे वंशज. तो निदान ६ महिने तरी जागा असायचा (म्हणे)..पण आम्ही तर अगदी निद्रादेवीचे प्रामाणिक भक्त! तिला कधी नाही म्हणायचं नाही.."आलीस? ये...आल्यासारखी आता जरा शेजारी पण जाऊन ये...आणि ८-१० तास थांबच कशी!!!" वगैरे आमचे नि तिचे संवाद.
लहान असताना एक नरक चतुर्दशी सोडली तर मी कधी घड्याळात सकाळचे ५ बघितले नव्हते. ट्रिप वगैरे असेल तरी जास्तीत जास्त उशिरा ऊठायचं नी पटापट आवरायचं, हे ठरलेलं. आणि देव तारी त्याला कोण मारी? पूर्ण शालेय जीवनात माझी फ़क्त ३ च वर्ष सकाळची शाळा होती. प्राथमिक पर्यंत तर मी ९:३० पर्यंत वगैरे झोपायचे...आईने मग ब्रश, आंघोळीचं पाणी सगळं तयार ठेवून मला उठवायचं, दणादण आवरून मी शाळेत परत वेळेत हजर! एकदा ऊठलं कि गाडी जोरात, पण एकदा झोपलं कि मग ज्याचं नाव ते.
"झोप म्हणजे झोप म्हणजे झोप असते, तुमची आमची ती मुळीच सेम नसते" :) तुम्ही घरी झोपलेले आहात आणि बाहेर गेलेले आई बाबा दार वाजवून थकले...इतके कि त्यांनी घरावर दगड फेकून मारावे असं झालंय? बरं, आता त्या दगडाचा आवाज ऐकून झोपेतून बळंच ऊठून दाराऐवजी बाल्कनीचं दार उघडलं असं कधी झालंय?? झोपेचा वारसा आमचा वडिलोपार्जित आहे... माझी आजी झोपाळू. तिला त्या वेळच्या जीवनपद्धतीनुसार बरंच काम करावं लागायचं, पण ती झोप वगैरे कायम तब्येतीत काढायची. मग आमचे बाबा... कोयनेचा भूकंप पुण्यात बराच जाणवला... बाबा त्यावेळी घरात झोपले होते...आणि शेजार्यांनी येऊन ऊठवे पर्यंत बाबांना काहीही पत्ता नव्हता.माझी आत्येबहीण जे.जे ला MBBS करत होती... रात्री जागून परत पहाटे उठून अभ्यास. मग असंच एकदा २ ल झोपून परत ४:३० चा गजर लावून झोपली. २.३० तास पटकन गेले...आणि गजर झाला. इतकी साखरझोप या घड्याळाने मोडली...झालं...झोपेतच ते उचलून तिने खिडकी बाहेर फेकून दिलं. hostel चा watchman वेडाच व्हायचा बाकी राहिला असणार :) तिचाच अजून एक किस्सा.. मुंबई हून रत्नागिरीची गाडी...गाडी पहाटे रत्नागिरीला पोचली, हिने सवयीप्रमाणे ताणून दिली होती. कंडक्टर ने उठवलं..
"ताई, रत्नागिरी आलं"
"५ च मिनिटं झोपू दे" ही अजून झोपेतच :)
परत ५ मिनिटानी "ताई, ऊठा आता... गाडी आत मध्ये लावायची आहे."
"५ मिनिटं झोपू दे ना पण!!!"
"मग झोपा आणि चला परत मुंबईला"
मग एकदम खाडकन उठली. आता तीच ताई सलग ३२-३४ तास काम करते. पण आमचा कोणाचाच प्रश्न जागाण्याचा नाहीच आहे. एकदा झोपलो कि मग मात्र ऊठवणे हा एक project आहे!
माझा दादा :) बाबा त्याला रोज सकाळी ऊठवायचे..संस्कृतचं पाठांतर कर म्हणून... बाबा ६ ला ऊठवायला लागायचे, दादा दर वेळी ५-५ मिनिट्म करून ३०-४० मिनिटं झोपून घ्यायचा. एकदा तर "बाबा, ५ च मिनिटं.. स्वप्न पडतंय" असं म्हणाला होता. बाबांना हसावं कि रागवावं कळ्लं नसणार त्यावेळी. हाच दादा अगदी पेपरला जाताना पण १० मिनिटं झोप काढूनच जायचा..वर तसं केलं तर पेपर बरा जातो हे logic! आईच्या सहनशक्तीचा अगदी अंत पाहिला आमच्या झोपेने. मी तर अजूनही २ मिनिटं आहेत असं बघूनहि परत झोपू शकते. झोपायला (अति) जास्त मिळावं म्हणून मी बाकिचं भराभर आवरायला शिकले...म्हणजे उठले सगळं आवरून मी ३०-३५ मिनिटात बाहेर पडू शकते..आणि याचा onsite ला फ़ार फ़यदा झाला :)
कॉलेग मध्ये चष्मा असलेल्या लोकांचं बरं असं वाटायचं. टयुबचा प्रकाश पडला कि डोळे बंद काय उघडे काय काही कळत नाही. असंच एकाला सरांनी खडू मारून दचकवलं होतं. कंपनीच्या बस मध्ये लोक जबरी मस्त झोपतात.. विप्रो मधला एक almost पडायचा बाकी राहिला होता. मी एकदा बस मध्ये ताणून दिल्याने २-३ stop पुढे उतरले आहे. मग झोप आली कि आता मोबाईल वर गजर लावूनच झोपते. परत earphone, vibrator सगळं चालू ठेवायचं! आत्ताच्या ऑफिस मध्ये एक tester कोपर्यातल्या cubicle मध्ये झोपायचा.. मला जाम हेवा वाटायचा त्याचा. पण मग पुढे त्याच्या manager ने त्याला एकदम highway cubicle मध्येच बसवला. त्यानंतर त्याचं वजन २ महिन्यात ४ किलो ने कमी झालं असं आम्ही त्याला चिडवतो :)
कित्ती प्रयत्न केला तरी मला अजून सकाळी लवकर ऊठायची सवय लागलेली नाही. आई कडून सगळ्यात जास्त मी या बाबतीत रागावून घेतलं असेल... हल्ली तिला रात्री झोप उशीरा लागते म्हणून मग सकाळी जाग येत नाही, तर मी ऊठल्यावर का ऊठवलं नाही म्हणून परत माझ्याच वर चिडते. :) पण मला झोपायला आवडतं त्यामुळे असं छान झोपणार्याला मी सहसा ऊठवत पण नाही. झोप म्हणजे सुख असतं... ते जग तुमचं असतं...तुम्ही वाटेल ती स्वप्न त्या जगात बघू शकता. सुदैवाने झोप उडावी असं भयंकर भीतीदायक किंवा तरल आल्हाददायक दोन्ही कधी फारसं कधी झालं नाहीये... म्हणजे भयंकर भीतीदायक कोणाच्याच बाबतीत नको म्हणा...आणि ठराविक तरल आल्हाददायक चालेल... म्हणजे झोप नाही तर निदान साखरझोप तरी मिळते. :)
अन्न हे पूर्ण्ब्रह्म आहे खरंच... पण अन्नाची चोरी करता येते. झोप पण अन्नाइतकीच गरजेची आहे माणसाला...पण ती चोरता येत नाही. ज्याच्या नशिबात जितकी तितकीच त्याला ती प्रसन्न होणार. आज मी चार तासच झोपणार म्हणलं की ७-८ तास झोप लागते. आणि आज जास्त झोपू म्हणलं की २ तासात जाग येते. आपल्याकडे इतके देव आहेत आणि त्याची आपण अगदी व्यवस्थित पूजा करतो...मग कोणी "निद्रा"देवी ची पूजा का नाही करत? म्हणजे या घरातल्या लोकांना शांत झोप मिळू दे..त्यांना जास्तीत जास्त स्वप्न बघता यावीत असं का कोणी त्या देवीकडे साकडं घालत?
चला...खूप च लिहिलं...झोप आली :) तसही हे पोस्ट मी ३ दिवस लिहिते आहे...लिहायला घेतलं की निद्रादेवी यायच्या, मग आमचं तत्व "आलीस? ये...आल्यासारखी आता जरा शेजारी पण जाऊन ये...आणि ८-१० तास थांबच कशी!!!" वगैरे :))
देवीची कृपा अशीच सगळ्यांवर राहो....
॥ श्री निद्रादेवी प्रसन्न॥
Tuesday, April 21, 2009
Wednesday, January 14, 2009
आवाज कि दुनिया
आज नेहमीप्रमाणे बस मध्ये वाचत बसले होते. शेजारचा माणूस मोबाईल वर गाणी ऐकत खिडकीतून बाहेर बघत बसला होता... ’झेन गार्डन’ वाचत होते... मस्त कथा...त्यामुळे मी एकदम तंद्रीमध्ये. अचानक एक विचित्र "हॅलो" ऐकू आला..चमकून बघितलं तर शेजारचा तो फोनवर बोलत होता. तो दिसायला एकदम आडवा माणूस...केस थोडे पांढरे..चेहर्यावर एक गंभीरपणा आणि आवाज एकदम पातळ... मला एकदम हसूच आलं. म्हणलं केवढा माणूस आणि कसा आवाज!!!!
पण हे असं खूप वेळा बघितलं आहे, आवाज आणि दिसणं यातली विसंगती. पण विसंगती कशी? म्हणजे अमूक अमूक आवाजाची व्यक्ती अशीच असेल हे तर मनाचा खेळ झाला. आणि मग तशी ती व्यक्ती नसेल कि मला आलं तसं एकदम हसू येतं, आश्चर्य वाटतं, क्वचित भ्रमनिरास, अपे़क्षाभंग वगैरे.
मला आठवतंय माझ्या दादाचा एक मित्र होता...एकदम गोरा गोमटा, खात्या-पित्या घरचा. तो पहिल्यांदा घरी आला तेव्हा दार मीच उघडलं... आणि त्याचा आवाज ऐकून पळत जाऊन दादा ला सांगितलं कि "मुलीच्या आवाजाचा तुझा मित्र आला आहे". नंतर तो आमच्याकडे खूप वेळा आला, हळूहळू माझी ओळख वाढली तसं माझ्याशीही बोलायला लागला आणि मग त्याच्या त्या आवाजाची सवय झाली. पण माझ्या त्या निरोपामुळे मी त्याला त्याच्या नावाच्या feminine version नेच हाक मारायचे. मग मोठी झाले...आता त्याचं लग्न झालं नि मग कधीतरी मी त्याला त्याच्या मूळ नावाने हाक मारायला सुरूवात केली. :)
शाळेत एक बाई होत्या... मी शाळेत असताना चांगलं(??) गायचे वगैरे..त्यामुळे त्यांचा आनि माझा बराच संबंध आला. तबला सुरेख वाजवायच्या. पण आवाज एकदम फ़ाटलेला. त्या बोलायला लागल्या कि यांनी तबला भाषा शोधून काढावी असं वाटायचं.
आधीच्या कंपनीत माझ्या टीम मध्ये एक IIT fresher होता. डोकं एकदम मस्त. पण आवाज म्हणजे हसू आवरायचं नाही. त्याला ऑफिस मध्ये एकदा एका credit card साठी फोन आला. हे credit card वाले जनरल फोन करत असतात. ते ext. कोणाचं आहे हे त्यांना माहीतच नसतं. तर याने फोन घेतला..
"हॅलो"
"I m xyz from a bank."
"ok"
"mam, आप credit card में interested हो?"
"I m not a mam. My name is Susheel" (name changed here)
बास हे ऐकून आम्ही त्या cubicle मधले सगळे हसून पडायचे बाकी राहिले होतो. कित्येक दिवस आम्ही त्याची या एका dialogue वरून खेचायचो.
अजून एक मित्र आहे त्याचा आवाज एकदम भारदस्त आहे..पण दिसायला अगदी fresh out of college वाटतो. आणि असा त्याला अगदी official feedback मिळाला आहे :)
"स्नेहल, आज च्या बंड्याचा उद्या तुला verification call घ्यावा लागेल" असं मला आमचा HR सांगतो. हे असं पूर्वी पण अनेकदा मी केलंय...आता सवय झालीये. पण पहिल्यांदा असं करायचं होतं तेव्हा झेपलंच नव्हतं कि मी असं न बघितलेल्या माणसाचं कसं काय verification करणार? Telephonic interview नंतर हाच "तो" यासाठी हे सगळे खटाटोप. मग "त्या" चा आवाज, काही उत्तरं पडताळून बघायची आणि verification करायचं..असलं काहीतरी अजब तंत्र. म्हणजे मग मी आधी बोलले आणि verification केलं त्यात मध्ये त्या माणसाचा आवाज बसला असेल तर? पण हे असले प्रश्न मी मनात च ठेवते.
सगळी आवाजाची जादू, मजा आहे. आज च्या "नेट" च्या युगात तर चेहर्याआधी आवाजाची च ओळख होते. मायबोली, blog मुळे तर मी कित्येकांशी आधी फोन वर बोलले मग भेटले आहे. मजा येते कधीकधी. आवाज आणि ती व्यक्ती असं काही अजब सूत्र मनाशी मांडताना.
नोकरीमध्ये काम बदलत गेलं तसतसं आता मला distributed teams बरोबर काम करावं लागतं. तिथे तर अनेकदा फोन वर च बोलणं होतं. Client team तर सगळी आवाजानेच परिचीत असते. अशीच एक business analyst आहे..फोन वर तिचा आवाज कायम तोंडावर कोणी हात ठेवावा तसा येतो. त्यावरून मला वाटलं होतं कि एकदम मोठी, उदास बाई असेल... मग एक दिवस तिचा फोटो बघितला.. कमालच होती...ही बाई माझ्याच वयाची आणि सुंदर म्हणावी अशी आहे. तिचीच सहकारी आवाजावरून तरूण वाटते तर ती निघाली ४५ वर्षाची :)
हे तर झालं माझ्या सारख्या इतर काही लोकांचं. पण जे प्रतिथयश लोक असतात त्यांचा पण आवाज कित्येकदा गमतीशीर असतो. राणी मुखर्जी!!! कायम या बाईला सर्दी झालीये असा आवाज. श्रीदेवी... प्रचंड नकोसा वाटणारा अनुनासिक, अल्लड आवाज...सुनिल शेट्टी..उगाचच घसा बसल्यावर बोलतो तशातला काहीतरी आवाज. हेमामालिनी चा आवाज जरा भारी आहे. त्यात तिचा accent पण दाक्षिणी आहे. अजून च गंमत येते त्यामुळे! सचिन... काय अफ़ाट खेळतो, तोड नाही.. पण आवाजात मार खाल्ला आहेच.
काहीकाही आवाज मात्र वेड लावतात... श्रेया घोशाल, सुरेश वाडकर, लता, आशा, मन्ना डे, जगजित सिंग, हरीश भिमानी, अमिताभ... बरेच जण आहेत. पूर्वी दूरदर्शन वर बातम्या देणारे प्रदीप भिडे यांनी तर संपूर्ण करीअर जाहीराती, निरनिराळे कार्यक्रम यात आपल्या आवाजाचा ठसा उमटवत पुढे नेलं. कमाल असते.
आवाज हि देणगी आहे. आपण फ़ार फ़ार तर तो जपू शकतो...त्यातला fineness थोडा वाढवू शकतो.. पण तो एका मर्यादेपुढे कमावता येत नाही. ती शक्ती माणसाकडे नाही. जसा तुमचा-माझा रंग, उंची देव च ठरवून पाठवतो तसाच आवाजही. तरीही हसू आणणारे आवाज आहेत..वेड लावणारे आहेत तसेच चीड आणणारेही आहेत.
मी कित्येक मित्र-मैत्रीणींना फोन केल्यावर म्हणते... कामामुळे भेटणं होत नाही निदान आवाज तरी ऐकावा म्हणून फोन केला. नुसता त्यांचा आवाज ऐकला तरी जुन्या आठवणी जाग्या होतात..कोणी आसपास आहे असं वाटतं. अशा अनेकांचा आवाज एकमेकांना पोचवणार्या त्या Telecom industry ला खरंच सलाम!!!
नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा..
मेरी आवाज ही पेह्चान है..
गर याद रहे :)
आवाज कि दुनिया में आपका स्वागत है :)
पण हे असं खूप वेळा बघितलं आहे, आवाज आणि दिसणं यातली विसंगती. पण विसंगती कशी? म्हणजे अमूक अमूक आवाजाची व्यक्ती अशीच असेल हे तर मनाचा खेळ झाला. आणि मग तशी ती व्यक्ती नसेल कि मला आलं तसं एकदम हसू येतं, आश्चर्य वाटतं, क्वचित भ्रमनिरास, अपे़क्षाभंग वगैरे.
मला आठवतंय माझ्या दादाचा एक मित्र होता...एकदम गोरा गोमटा, खात्या-पित्या घरचा. तो पहिल्यांदा घरी आला तेव्हा दार मीच उघडलं... आणि त्याचा आवाज ऐकून पळत जाऊन दादा ला सांगितलं कि "मुलीच्या आवाजाचा तुझा मित्र आला आहे". नंतर तो आमच्याकडे खूप वेळा आला, हळूहळू माझी ओळख वाढली तसं माझ्याशीही बोलायला लागला आणि मग त्याच्या त्या आवाजाची सवय झाली. पण माझ्या त्या निरोपामुळे मी त्याला त्याच्या नावाच्या feminine version नेच हाक मारायचे. मग मोठी झाले...आता त्याचं लग्न झालं नि मग कधीतरी मी त्याला त्याच्या मूळ नावाने हाक मारायला सुरूवात केली. :)
शाळेत एक बाई होत्या... मी शाळेत असताना चांगलं(??) गायचे वगैरे..त्यामुळे त्यांचा आनि माझा बराच संबंध आला. तबला सुरेख वाजवायच्या. पण आवाज एकदम फ़ाटलेला. त्या बोलायला लागल्या कि यांनी तबला भाषा शोधून काढावी असं वाटायचं.
आधीच्या कंपनीत माझ्या टीम मध्ये एक IIT fresher होता. डोकं एकदम मस्त. पण आवाज म्हणजे हसू आवरायचं नाही. त्याला ऑफिस मध्ये एकदा एका credit card साठी फोन आला. हे credit card वाले जनरल फोन करत असतात. ते ext. कोणाचं आहे हे त्यांना माहीतच नसतं. तर याने फोन घेतला..
"हॅलो"
"I m xyz from a bank."
"ok"
"mam, आप credit card में interested हो?"
"I m not a mam. My name is Susheel" (name changed here)
बास हे ऐकून आम्ही त्या cubicle मधले सगळे हसून पडायचे बाकी राहिले होतो. कित्येक दिवस आम्ही त्याची या एका dialogue वरून खेचायचो.
अजून एक मित्र आहे त्याचा आवाज एकदम भारदस्त आहे..पण दिसायला अगदी fresh out of college वाटतो. आणि असा त्याला अगदी official feedback मिळाला आहे :)
"स्नेहल, आज च्या बंड्याचा उद्या तुला verification call घ्यावा लागेल" असं मला आमचा HR सांगतो. हे असं पूर्वी पण अनेकदा मी केलंय...आता सवय झालीये. पण पहिल्यांदा असं करायचं होतं तेव्हा झेपलंच नव्हतं कि मी असं न बघितलेल्या माणसाचं कसं काय verification करणार? Telephonic interview नंतर हाच "तो" यासाठी हे सगळे खटाटोप. मग "त्या" चा आवाज, काही उत्तरं पडताळून बघायची आणि verification करायचं..असलं काहीतरी अजब तंत्र. म्हणजे मग मी आधी बोलले आणि verification केलं त्यात मध्ये त्या माणसाचा आवाज बसला असेल तर? पण हे असले प्रश्न मी मनात च ठेवते.
सगळी आवाजाची जादू, मजा आहे. आज च्या "नेट" च्या युगात तर चेहर्याआधी आवाजाची च ओळख होते. मायबोली, blog मुळे तर मी कित्येकांशी आधी फोन वर बोलले मग भेटले आहे. मजा येते कधीकधी. आवाज आणि ती व्यक्ती असं काही अजब सूत्र मनाशी मांडताना.
नोकरीमध्ये काम बदलत गेलं तसतसं आता मला distributed teams बरोबर काम करावं लागतं. तिथे तर अनेकदा फोन वर च बोलणं होतं. Client team तर सगळी आवाजानेच परिचीत असते. अशीच एक business analyst आहे..फोन वर तिचा आवाज कायम तोंडावर कोणी हात ठेवावा तसा येतो. त्यावरून मला वाटलं होतं कि एकदम मोठी, उदास बाई असेल... मग एक दिवस तिचा फोटो बघितला.. कमालच होती...ही बाई माझ्याच वयाची आणि सुंदर म्हणावी अशी आहे. तिचीच सहकारी आवाजावरून तरूण वाटते तर ती निघाली ४५ वर्षाची :)
हे तर झालं माझ्या सारख्या इतर काही लोकांचं. पण जे प्रतिथयश लोक असतात त्यांचा पण आवाज कित्येकदा गमतीशीर असतो. राणी मुखर्जी!!! कायम या बाईला सर्दी झालीये असा आवाज. श्रीदेवी... प्रचंड नकोसा वाटणारा अनुनासिक, अल्लड आवाज...सुनिल शेट्टी..उगाचच घसा बसल्यावर बोलतो तशातला काहीतरी आवाज. हेमामालिनी चा आवाज जरा भारी आहे. त्यात तिचा accent पण दाक्षिणी आहे. अजून च गंमत येते त्यामुळे! सचिन... काय अफ़ाट खेळतो, तोड नाही.. पण आवाजात मार खाल्ला आहेच.
काहीकाही आवाज मात्र वेड लावतात... श्रेया घोशाल, सुरेश वाडकर, लता, आशा, मन्ना डे, जगजित सिंग, हरीश भिमानी, अमिताभ... बरेच जण आहेत. पूर्वी दूरदर्शन वर बातम्या देणारे प्रदीप भिडे यांनी तर संपूर्ण करीअर जाहीराती, निरनिराळे कार्यक्रम यात आपल्या आवाजाचा ठसा उमटवत पुढे नेलं. कमाल असते.
आवाज हि देणगी आहे. आपण फ़ार फ़ार तर तो जपू शकतो...त्यातला fineness थोडा वाढवू शकतो.. पण तो एका मर्यादेपुढे कमावता येत नाही. ती शक्ती माणसाकडे नाही. जसा तुमचा-माझा रंग, उंची देव च ठरवून पाठवतो तसाच आवाजही. तरीही हसू आणणारे आवाज आहेत..वेड लावणारे आहेत तसेच चीड आणणारेही आहेत.
मी कित्येक मित्र-मैत्रीणींना फोन केल्यावर म्हणते... कामामुळे भेटणं होत नाही निदान आवाज तरी ऐकावा म्हणून फोन केला. नुसता त्यांचा आवाज ऐकला तरी जुन्या आठवणी जाग्या होतात..कोणी आसपास आहे असं वाटतं. अशा अनेकांचा आवाज एकमेकांना पोचवणार्या त्या Telecom industry ला खरंच सलाम!!!
नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा..
मेरी आवाज ही पेह्चान है..
गर याद रहे :)
आवाज कि दुनिया में आपका स्वागत है :)
Tuesday, December 02, 2008
१०वी अ आणि सरमिसळ वही
कायापालट झालेल्या घरात अजूनही सामान पूर्ण लावून झालेच नाही.... नक्की काय ठेवायचं, काय देऊन टाकायचं नि काय टाकूनच द्यायचं यावर आमच्या सगळ्यांची डोकी चालूच आहेत आणि माझे-आईचे, माझे-दादा चे वाद पण! :)
नवीन सगळंच एकदम झकास झालेलं असलं तरी, जुन्याची आठवण आहेच. त्या जुन्या जागांचे, सामानाचे संदर्भ आठ्वून मग मन हळवंहि होतंच.
असंच काही आवरताना आख्खी दोन पोती पुस्तकं (अभ्यासाची!!!!) आणि काही शाळा-कॉलेज(सुवर्णकाळ..) मधल्या वह्या सापडल्या... पुस्तकांमध्ये अर्थातच कॉलेजची जास्त होती. अगदी cobol, data structures पासून servlets, ASP.NET पर्यंत सगळं, शिवाय मोठ्या दादाचे mechanical चे TOM, SOM इ. ठोकळे आहेतच. परत त्यातही आमची विभागणी चालूच...काय ठेवायचं किंवा कोणा होतकरूला द्यायचं, काय रद्दीत घालायचं आणि काय जाळून टाकायचं. तसं बघितलं तर सगळंच जवळपास कमीतकमी १० वर्षापूर्वीचं...पण जीव अगदी काल घेतलेल्या वस्तूप्रमाणे त्यावर जडलेला आणि अडकलेला.... मग सगळं आवरता आवरता एका खोलीत मी आणि चारही बाजूने आम्हा भावंडांचा तो शाळा-कॉलेज चा सुवर्णकाळ असं झालं. ३-४ तास तरी ते तसंच असणार...
अशातच सापडलेली माझी १० वी मधली शाळेची एक वही... माझी १० वी!!! कित्ती वर्ष झाली??? पण २ वर्षापूर्वी शाळेत जात होते कि काय इतक्या अजून आठवणी ताज्या आहेत. सकाळी ८:३० ते ११ क्लास, मग १२ ते ५:३० शाळा... आत्ताच्या मानाने तसं कमी व्यस्त वेळापत्रक...पण तेव्हा किती "बिझी" आहोत असं वाटायचं :) बरं एवढं सगळं करताना अभ्यास वगैरे जेमतेमच. १० वी चं वर्ष असूनही biology च्या journalमधल्या frog vissera टाईप अवघड आकृत्या गौतमी कडूनच काढून घेतलेल्या... आणि तेव्हाच ठरवलं की भविष्यात आपण biology घेऊन काहीही दिवे लावू शकत नाही! कदाचि गौतमी नसती तर माझे ते journal १० मार्कहि गेलेच असते :)
क्लास नि शाळा असं सगळं मिळून माझं दप्तर टम्म फुगायचं! मग मी आणि स्वाती (वर्गात शेजारी बसायची) ने डोकंच लढवलं. शाळेतल्या तासांची निम्मी पुस्तकं तिने आणायची आणि निम्मी मी :) वह्या पण मी बिन पुठ्ठ्याच्या कव्हर च्या आणल्या होत्या...त्यातलीच एक २०० पानी वही परवा सामान आवरताना सापडली. मस्त पंचरंगी पोपटाचं चित्र असलेली...(पुढे result मध्ये व्हायचा तो आमचा पोपट झालाच!!!)
पहिल्या पानावर छान (?) अक्षरात नाव, तुकडी वगैरे... मग phyiscs चा अभ्यास... जेमतेम ३०-४० पानं भरलेली. म्हणजे वही दिवाळी नंतर काढली असणार आणि जेमतेम १-१.५ महिना वापरली असणार. मग पुढे घरी अभ्यास(??) वगैरे करताना काहीबाही लिहिलेलं...मराठी वाक्प्रचार वगैरे.... परत बरीच पानं कोरी! काहीतरी आठवून मी वही एकदम मागच्या पानापासून बघायला सुरूवात केली. काय असेल शेवटच्या पानावर :) हसू येतं आता... मागून biology चा अभ्यास (कि आभास!!!). किती नावडतं होतं biology कि वहीतही मी त्याला मागून सुरूवात केली होती. मग एक-एक पान करत मागे-मागे बघत चालले. phyiscs ची निदान ३०-४० पानं तरी होती, इथे biology चं सगळं १५-२० पानातच उरकलं होतं. So much I hated this subject!!!! मग १-२ ठिकाणी जाने-फेब्रु मधलं अभ्यासाच (त्यापेक्षा कधी झोपायचं याचंच जास्त) वेळापत्रक... मग काही संस्कृतची सुभाषितं, त्यांचे अर्थ. क्वचित ठिकाणी chemistry च्या reactions देखील!!! गणित हा स्वतंत्र आवडता प्रांत असल्याने या वहीत त्याचे घुसखोरी झाली नसावी! मग कधीतरी परिक्षा झाल्यावर मी आणि दादाने टेप करून आणायच्या गाण्यांची केलेली यादी. त्याचा आवडता किशोर आणि मी सगळी त्या वेळ्ची नवीन गाणी यादीत घेतलेली.... cassette च्या एका साईड ला ९ गाणी बसताता या हिशोबाने त्याने त्याची १८ आणि मी माझी १८ गाणी निवडून टिपून ठेवलेली. आई ग!!! काय धमाल होते दिवस!
रिझल्ट लागल्यावर बरंच काही रद्दीत गेलं असणार... मग कॉलेज सुरू झाल्यावर पण शाळेतले हे दिवस थोडे विसरल्यासारखेच झाले असणार. पण ही वही कशी कोण जाणे माझ्याच कप्प्यात राहिली..आणि आज आवरता आवरता माझ्या मनाचे किती कप्पे सताड उघडून गेली?? :)
नवीन सगळंच एकदम झकास झालेलं असलं तरी, जुन्याची आठवण आहेच. त्या जुन्या जागांचे, सामानाचे संदर्भ आठ्वून मग मन हळवंहि होतंच.
असंच काही आवरताना आख्खी दोन पोती पुस्तकं (अभ्यासाची!!!!) आणि काही शाळा-कॉलेज(सुवर्णकाळ..) मधल्या वह्या सापडल्या... पुस्तकांमध्ये अर्थातच कॉलेजची जास्त होती. अगदी cobol, data structures पासून servlets, ASP.NET पर्यंत सगळं, शिवाय मोठ्या दादाचे mechanical चे TOM, SOM इ. ठोकळे आहेतच. परत त्यातही आमची विभागणी चालूच...काय ठेवायचं किंवा कोणा होतकरूला द्यायचं, काय रद्दीत घालायचं आणि काय जाळून टाकायचं. तसं बघितलं तर सगळंच जवळपास कमीतकमी १० वर्षापूर्वीचं...पण जीव अगदी काल घेतलेल्या वस्तूप्रमाणे त्यावर जडलेला आणि अडकलेला.... मग सगळं आवरता आवरता एका खोलीत मी आणि चारही बाजूने आम्हा भावंडांचा तो शाळा-कॉलेज चा सुवर्णकाळ असं झालं. ३-४ तास तरी ते तसंच असणार...
अशातच सापडलेली माझी १० वी मधली शाळेची एक वही... माझी १० वी!!! कित्ती वर्ष झाली??? पण २ वर्षापूर्वी शाळेत जात होते कि काय इतक्या अजून आठवणी ताज्या आहेत. सकाळी ८:३० ते ११ क्लास, मग १२ ते ५:३० शाळा... आत्ताच्या मानाने तसं कमी व्यस्त वेळापत्रक...पण तेव्हा किती "बिझी" आहोत असं वाटायचं :) बरं एवढं सगळं करताना अभ्यास वगैरे जेमतेमच. १० वी चं वर्ष असूनही biology च्या journalमधल्या frog vissera टाईप अवघड आकृत्या गौतमी कडूनच काढून घेतलेल्या... आणि तेव्हाच ठरवलं की भविष्यात आपण biology घेऊन काहीही दिवे लावू शकत नाही! कदाचि गौतमी नसती तर माझे ते journal १० मार्कहि गेलेच असते :)
क्लास नि शाळा असं सगळं मिळून माझं दप्तर टम्म फुगायचं! मग मी आणि स्वाती (वर्गात शेजारी बसायची) ने डोकंच लढवलं. शाळेतल्या तासांची निम्मी पुस्तकं तिने आणायची आणि निम्मी मी :) वह्या पण मी बिन पुठ्ठ्याच्या कव्हर च्या आणल्या होत्या...त्यातलीच एक २०० पानी वही परवा सामान आवरताना सापडली. मस्त पंचरंगी पोपटाचं चित्र असलेली...(पुढे result मध्ये व्हायचा तो आमचा पोपट झालाच!!!)
पहिल्या पानावर छान (?) अक्षरात नाव, तुकडी वगैरे... मग phyiscs चा अभ्यास... जेमतेम ३०-४० पानं भरलेली. म्हणजे वही दिवाळी नंतर काढली असणार आणि जेमतेम १-१.५ महिना वापरली असणार. मग पुढे घरी अभ्यास(??) वगैरे करताना काहीबाही लिहिलेलं...मराठी वाक्प्रचार वगैरे.... परत बरीच पानं कोरी! काहीतरी आठवून मी वही एकदम मागच्या पानापासून बघायला सुरूवात केली. काय असेल शेवटच्या पानावर :) हसू येतं आता... मागून biology चा अभ्यास (कि आभास!!!). किती नावडतं होतं biology कि वहीतही मी त्याला मागून सुरूवात केली होती. मग एक-एक पान करत मागे-मागे बघत चालले. phyiscs ची निदान ३०-४० पानं तरी होती, इथे biology चं सगळं १५-२० पानातच उरकलं होतं. So much I hated this subject!!!! मग १-२ ठिकाणी जाने-फेब्रु मधलं अभ्यासाच (त्यापेक्षा कधी झोपायचं याचंच जास्त) वेळापत्रक... मग काही संस्कृतची सुभाषितं, त्यांचे अर्थ. क्वचित ठिकाणी chemistry च्या reactions देखील!!! गणित हा स्वतंत्र आवडता प्रांत असल्याने या वहीत त्याचे घुसखोरी झाली नसावी! मग कधीतरी परिक्षा झाल्यावर मी आणि दादाने टेप करून आणायच्या गाण्यांची केलेली यादी. त्याचा आवडता किशोर आणि मी सगळी त्या वेळ्ची नवीन गाणी यादीत घेतलेली.... cassette च्या एका साईड ला ९ गाणी बसताता या हिशोबाने त्याने त्याची १८ आणि मी माझी १८ गाणी निवडून टिपून ठेवलेली. आई ग!!! काय धमाल होते दिवस!
रिझल्ट लागल्यावर बरंच काही रद्दीत गेलं असणार... मग कॉलेज सुरू झाल्यावर पण शाळेतले हे दिवस थोडे विसरल्यासारखेच झाले असणार. पण ही वही कशी कोण जाणे माझ्याच कप्प्यात राहिली..आणि आज आवरता आवरता माझ्या मनाचे किती कप्पे सताड उघडून गेली?? :)
Monday, September 22, 2008
पडदा
१३ वर्षापूर्वीचं घर... त्यावेळी घरात ५ माणसं असायची...आज त्याची ९ (२ बच्चे) झाली! ९ पैकी ३ आता जरा अंतरावर वेगळीकडे राह्तात... पण आठवड्यातून ४ वेळा तरी या जुन्या घराच्या ओढीने इकडे येतातच. या घरी राहायला आलो तेव्हा माझं भविष्य अजून काय आकार घेणार ते पण माहित नव्हतं. आणि मधल्या दादाला निदान त्याचा किरण दिसत होता; मोठ्या दादाचं त्या मानाने बरंच स्पष्ट होतं. बाबांनी अवघ्या आयुष्याची कमाई या घरात घातलेली... आमच्या आधीच्या घरातलं सामान घेऊन या घरात प्रवेश केला होता.
नवीन घरी लग्गेच सगळं नवीन घेणं शक्य नव्हतं.... पण पडदे तर हवेच होते. आधीच्या घरी आम्ही दार च फक्त रात्री झोपताना लावायचो तिथे पडदे कशाला? तिथे माणसं मनाचे आणि घराचे दरवाजे उघडे ठेवून च फ़िरत. तर मग नवीन घरी आल्याआल्या त्याच आठवड्यात आई-बाबा पदद्याचं कापड आणायला गेले होते. आधीचं घर आकाराने लहान, त्यात पडद्याची आवश्यकताच नाही अशी साधी राहणी. आई ने कपाटाला, एका खिडकीला वगैरे पडदे शिवले होते पण ते आपली तिची घर सजवायची आणि शिवणकाम करायची हौस म्हणून. पडदा पाहिजेच असा आमचा कोणाचाच आग्रह नसायचा. मी तर घरात कमी नि बाहेर जास्त असला प्रकार... :) मग माझ्या लहानपणी आईच कधीकधी मैत्रिणींबरोबर जाऊन पडद्याचं कापड आणत असे...कसा शिवायचा वगैरे चा मनात बेत करत असे. आम्हा भावंडांना पडदा म्हणजे येताजाता लोंबायला, हात पुसयला, खेळता-खेळता लपायला इतकाच तो त्याचा उपयोग माहित होता. पडदयाला याहून जास्त महत्त्व त्यावेळी आमच्या कोणाच्याच आयुष्यात नव्हतं.
मग नवीन घरी कोणी एक माणूस येऊन खिडक्यांची मापं घेऊन गेला.... त्यावरून खर्चाचा अंदाज दिला. अबब!!! २१ मीटर कापड लागणार होतं. माझ्या कल्पनेपलिकडचंच होतं... पडदे शिवून आले... ते लावायला खास बार, कडेला शो च्या मुठी वगैरे पण आले....काहीतरी झाकायला लागणारा पडदा स्वत:च इतका सजला कि क्या बात है!! नवीन घर बघायला येणारे लोक पण "पडदे छान आहेत हो" असं म्हणू लागले. या सगळ्या प्रकारामुळे मी पण कोणाकडे गेले कि त्या घरातले पडदे लक्ष देऊन बघू लागले. हळूहळू मग कळत गेलं कि पडदा हा गृहसजावटी मधला महत्त्वाचा भाग आहे. त्यात निरनिराळ्या प्रकाराचे कापड असते, शिवण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्याच्या रंगसंगतीमुळेहि घराच्या शोभेत बराच फ़रक पडतो वगैरे मौलिक भर पडत गेली. पण तरी पडदा हे प्रामुख्याने आई चे आणि नंतर आई-वहिन्यांचे क्षेत्र राहिले... मी नवीन/ धुतलेले पडदे लावणे आणि कसे आहेत यावर प्रतिक्रिया देणे या व्यतिरिक्त जास्त कधी काही केलं नाही.
आता आमच्या याच १३ वर्षापूर्वीच्या घराचा काहिसा कायापालट करायचा आम्ही घाट घातला... अगदी रितसर interior वाल्याला काम देऊन वगैरे. या रविवारी पडद्याचं कापड बघायला जायचं ठरलं... कधी नव्हे ते मी पण येते म्हणाले... आई ला नेमकं बरं वाटत नसल्याने ती येऊ शकली नाही. लक्ष्मी रोड वरच्या काही दुकानात गेलो. काय सुरेख व्हरायटी असते... अगदी त्या रंगीत दुनियेत गुंडाळल्यासारखं वाटलं. साडीच्या दुकानात साडी ड्रेप करून दाखवतात तसा इकडे पडदाहि ड्रेप करून दाखवतात!! परत दुकानात निरनिराळे samples होतेच display ला. पडदा, तो बांधायला शोभेचं अजून काही.. पडद्यात पण sheer वगैरे प्रकार. हे sheer म्हणजे एक पारदर्शक, झुळझुळीत कापड. मनात आलं असला पडदा काय कामाचा? हेच भाव कदाचित चेहर्यावर उमटले तसा interior वाला म्हणाला "फार सुंदर दिसतं हे", कि लागलीच दुकानदार ते ड्रेप करून दाखवू लागला. इतकंच काय त्या दुकानवाल्याने चहा/कॉफी घेणार का इतपत विचारलं. पडदे खरेदी बरीच सुखदायक असते कि! :) २-३ दुकानातले samples घेऊन परत निघालो.
१३ वर्षापूर्वीच्या संपूर्ण घराच्या पडद्याची किंमत आता एका पडद्याला जेमतेम पुरत होती. आणि इतकं करून लहानपणी मी ज्याला मनासारखं हात पुसायचे, लपायचे तसलं काहीही करू शकणार नव्हते :( वाटलं...स्नेहल नुसतं घर बदललं, त्याचे पडदे बदलले असं का आहे? आधीच्या घरातून इकडे येताना तू पण किती बदललीस? तिकडे सहज कोणाच्याहि घरात शिरणारी, कुठेहि भटकणारी, सगळ्या जनतेला "मुतालिकांची मुलगी" म्हणून माहित असलेली ..नवीन घरात किती कोशातली झाली? वय हे एक कारण असेल... पाचव्या वर्षी जशी मैत्री होते तितकी सहज ती १८ व्या वर्षी नाहीच होऊ शकत! म्हणजे मनाने पण नवीन पडदे च घेतले तर... पण मग पडदे घर सजवतात, काही न दाखवाव्या अशा गोष्टी पडद्यामागे लपतात...माझं तसं च आहे?? कि मनाचे हे पड्दे कसे आहेच याचा मी कधी विचारच नाही केला? ते माझी शोभा वाढवताहेत कि माझी शोभा करताहेत? कधी विचारच नाही केला.... या पडद्यांमुळेच कदाचित मला बरंच चांगलं काही दिसलं नाही, त्यामुळे मी ते आत्मसात करण्याचा प्रयत्नच केला नाही. नवीन आलेल्या त्या sheer सारख्या पारदर्शक पडद्यासारखा एखादा तरी sheer माझ्या मनात आहे? आणि त्यातून मी जगाला आणि जग मला अस स्वच्छ बघू शकत आहोत का? कोण जाणे. कायापालट झालेल्या घरातल्या नवीन पडद्याबरोबर मी पण जरा मनाचे हे पडदे बदलून बघेन... निदान प्रयत्न तर नक्कीच करेन.
नवीन घरी लग्गेच सगळं नवीन घेणं शक्य नव्हतं.... पण पडदे तर हवेच होते. आधीच्या घरी आम्ही दार च फक्त रात्री झोपताना लावायचो तिथे पडदे कशाला? तिथे माणसं मनाचे आणि घराचे दरवाजे उघडे ठेवून च फ़िरत. तर मग नवीन घरी आल्याआल्या त्याच आठवड्यात आई-बाबा पदद्याचं कापड आणायला गेले होते. आधीचं घर आकाराने लहान, त्यात पडद्याची आवश्यकताच नाही अशी साधी राहणी. आई ने कपाटाला, एका खिडकीला वगैरे पडदे शिवले होते पण ते आपली तिची घर सजवायची आणि शिवणकाम करायची हौस म्हणून. पडदा पाहिजेच असा आमचा कोणाचाच आग्रह नसायचा. मी तर घरात कमी नि बाहेर जास्त असला प्रकार... :) मग माझ्या लहानपणी आईच कधीकधी मैत्रिणींबरोबर जाऊन पडद्याचं कापड आणत असे...कसा शिवायचा वगैरे चा मनात बेत करत असे. आम्हा भावंडांना पडदा म्हणजे येताजाता लोंबायला, हात पुसयला, खेळता-खेळता लपायला इतकाच तो त्याचा उपयोग माहित होता. पडदयाला याहून जास्त महत्त्व त्यावेळी आमच्या कोणाच्याच आयुष्यात नव्हतं.
मग नवीन घरी कोणी एक माणूस येऊन खिडक्यांची मापं घेऊन गेला.... त्यावरून खर्चाचा अंदाज दिला. अबब!!! २१ मीटर कापड लागणार होतं. माझ्या कल्पनेपलिकडचंच होतं... पडदे शिवून आले... ते लावायला खास बार, कडेला शो च्या मुठी वगैरे पण आले....काहीतरी झाकायला लागणारा पडदा स्वत:च इतका सजला कि क्या बात है!! नवीन घर बघायला येणारे लोक पण "पडदे छान आहेत हो" असं म्हणू लागले. या सगळ्या प्रकारामुळे मी पण कोणाकडे गेले कि त्या घरातले पडदे लक्ष देऊन बघू लागले. हळूहळू मग कळत गेलं कि पडदा हा गृहसजावटी मधला महत्त्वाचा भाग आहे. त्यात निरनिराळ्या प्रकाराचे कापड असते, शिवण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्याच्या रंगसंगतीमुळेहि घराच्या शोभेत बराच फ़रक पडतो वगैरे मौलिक भर पडत गेली. पण तरी पडदा हे प्रामुख्याने आई चे आणि नंतर आई-वहिन्यांचे क्षेत्र राहिले... मी नवीन/ धुतलेले पडदे लावणे आणि कसे आहेत यावर प्रतिक्रिया देणे या व्यतिरिक्त जास्त कधी काही केलं नाही.
आता आमच्या याच १३ वर्षापूर्वीच्या घराचा काहिसा कायापालट करायचा आम्ही घाट घातला... अगदी रितसर interior वाल्याला काम देऊन वगैरे. या रविवारी पडद्याचं कापड बघायला जायचं ठरलं... कधी नव्हे ते मी पण येते म्हणाले... आई ला नेमकं बरं वाटत नसल्याने ती येऊ शकली नाही. लक्ष्मी रोड वरच्या काही दुकानात गेलो. काय सुरेख व्हरायटी असते... अगदी त्या रंगीत दुनियेत गुंडाळल्यासारखं वाटलं. साडीच्या दुकानात साडी ड्रेप करून दाखवतात तसा इकडे पडदाहि ड्रेप करून दाखवतात!! परत दुकानात निरनिराळे samples होतेच display ला. पडदा, तो बांधायला शोभेचं अजून काही.. पडद्यात पण sheer वगैरे प्रकार. हे sheer म्हणजे एक पारदर्शक, झुळझुळीत कापड. मनात आलं असला पडदा काय कामाचा? हेच भाव कदाचित चेहर्यावर उमटले तसा interior वाला म्हणाला "फार सुंदर दिसतं हे", कि लागलीच दुकानदार ते ड्रेप करून दाखवू लागला. इतकंच काय त्या दुकानवाल्याने चहा/कॉफी घेणार का इतपत विचारलं. पडदे खरेदी बरीच सुखदायक असते कि! :) २-३ दुकानातले samples घेऊन परत निघालो.
१३ वर्षापूर्वीच्या संपूर्ण घराच्या पडद्याची किंमत आता एका पडद्याला जेमतेम पुरत होती. आणि इतकं करून लहानपणी मी ज्याला मनासारखं हात पुसायचे, लपायचे तसलं काहीही करू शकणार नव्हते :( वाटलं...स्नेहल नुसतं घर बदललं, त्याचे पडदे बदलले असं का आहे? आधीच्या घरातून इकडे येताना तू पण किती बदललीस? तिकडे सहज कोणाच्याहि घरात शिरणारी, कुठेहि भटकणारी, सगळ्या जनतेला "मुतालिकांची मुलगी" म्हणून माहित असलेली ..नवीन घरात किती कोशातली झाली? वय हे एक कारण असेल... पाचव्या वर्षी जशी मैत्री होते तितकी सहज ती १८ व्या वर्षी नाहीच होऊ शकत! म्हणजे मनाने पण नवीन पडदे च घेतले तर... पण मग पडदे घर सजवतात, काही न दाखवाव्या अशा गोष्टी पडद्यामागे लपतात...माझं तसं च आहे?? कि मनाचे हे पड्दे कसे आहेच याचा मी कधी विचारच नाही केला? ते माझी शोभा वाढवताहेत कि माझी शोभा करताहेत? कधी विचारच नाही केला.... या पडद्यांमुळेच कदाचित मला बरंच चांगलं काही दिसलं नाही, त्यामुळे मी ते आत्मसात करण्याचा प्रयत्नच केला नाही. नवीन आलेल्या त्या sheer सारख्या पारदर्शक पडद्यासारखा एखादा तरी sheer माझ्या मनात आहे? आणि त्यातून मी जगाला आणि जग मला अस स्वच्छ बघू शकत आहोत का? कोण जाणे. कायापालट झालेल्या घरातल्या नवीन पडद्याबरोबर मी पण जरा मनाचे हे पडदे बदलून बघेन... निदान प्रयत्न तर नक्कीच करेन.
Thursday, September 04, 2008
बाप्पा... हसू कि रडू?
बाप्पा...दरवर्षीप्रमाणे ठरल्या वेळेला तुम्ही आलात. फ़ार आनंद वाटला... आज-कालच्या दिवसात दिलेला शब्द आणि ठरलेली वेळ पाळणारे फ़ार थोडे. या पार्श्वभूमीवर नित्यनियमाने एक तुम्ही येता.. तुमसे बढकर कौन? इथे देशात काहीच वेळेवर होईना झालंय.
कॉलेजचा प्रवेश असो, घराचं बांधकाम असो, पाऊस असो कि निवडणूका असोत. सगळ्याचीच वेळ बदलली आहे. ऑगस्ट मध्ये कॉलेज सुरू कि लगेच ऑक्टोबर मध्ये submissions! अधला-मधला वेळ असाच welcome party वगैरे मध्ये गेलेला.... पाऊस पण जून मध्ये दडी मारतो नि आता बघताच आहात कि तुम्ही यायची वेळ झाली तरी कसा बिनदिक्कत बदाबदा कोसळतोय. लोक तर निवडणूक या प्रकाराला इतके सरावले आहेत कि जणू शाळेतल्या वर्गात सेक्रेटरी निवडावा. :( सगळं आबादी आबाद आहे बाप्पा!
आंबेडकरांनी सांगितलं होतं कि सवलतींवर जगू नका, आज इथे सवलतीशिवाय कोणी जगायला नको म्हणतोय. माणसांच्या शरीराची जाडी वाढतेय नि मनं संकुचित होत चालली आहेत. शिक्षणाने लोक उदात्त कमी झाले नि कोते जास्त. पंचविशीतला मुलं सरळ सांगतात कि "माझं आई-बाबांशी पटत नाही", अरे पण हा विचार करायला याला समर्थ कोणी केला? लहानपणी जास्त त्रास देतो म्हणून तुला सोडलं का आई-बाबांनी??
सगळं जीवनच व्यस्त झालंय... पैसे जास्त-वेळ कमी, घर मोठं-माणसं कमी, शरीर मोठं-कपडे कमी, देखावा जास्त-आपलेपणा कमी, झोप जास्त-स्वप्न कमी, नेते जास्त-आदर्श कमी, चोरी जास्त-निर्मिती कमी! चेहरा खराब झाला तर निरनिराळे लेप लावून स्वच्छ करतात..पण आमच्या मनावरच्या जळमटांचं काय? बाप्पा... मनासाठी एखादं parlour काढता येईल का? वयात येणार्या मुला-मुलींना आहार नियमांबरोबर विचार नियम किती जण समजावून देत असतील?
आजच वर्तमानपत्रात तुमचं अगदी वाजत-गाजत स्वागत झाल्याची सचित्र बातमी वाचली.... पण जरा शेजारी नजर जाते तर अमेरिकेने अणुकरारात केलेली दिशाभूल दिसली. विद्यमान सरकारने स्वत:ची तोंड लपवण्यासाठी केलेला विश्वासघात दिसला. एका आडरानात दरोडेखोरांनी महिलांवर केलेला अत्यचार दिसला. "एक लाखात कार" प्रकल्पाच्या अजून नवीन बातम्या वाचल्या. बिहार मधील लोकांचे हाल दिसले... विदर्भात पाणी नाही म्हणून माणूस मरतोय आणि बिहार मध्ये पाणी आलं म्हणून माणूस मरतोय! पाणी म्हणजे जीवन ना रे... मग जीवन सुद्धा अति झालं कि त्रासच होतोय!
तू म्हणशील काय आज वर्षानी आलो तर मला काही माहित नसल्यासारखं सगळं सांगते आहेस. तुलाच सगळं माहित आहे रे... तूच कर्ता आणि करविता! पण सगळंच इतकं दाहक नको ना करूस. माणूस चुकला...चुकतो आहे. पण तू त्याला योग्य त्या मार्गावर लवकरात लवकर आण.
आता म्हणशील इतकं काही वाईत नाहीये ....ते पण खरंच आहे. वर सांगितलेल्या सगळ्या परिस्थीतीतच प्रकाश-मंदा आमटे आहेत, अभिनव बिंद्रा आहे, भारतीय त्रिदल सेना आहे. पण महाभारताप्रमाणेच सुष्ट आणि दुष्ट हे व्यस्त प्रमाणात आहेत. मान्य आहे रे हे सगळं आमच्यामुळेच... पण तू आला आहेस तोवर मन मोकळं करून घेतलं. दहा दिवसात तू बघशीलच सगळं.... मग पुढच्या वर्षी येताना हे कमी करण्याच्या योजना घेऊनच ये. यंदा जाता जाता शक्य तितक्या लोकांना सुष्ट व्हायच्या मार्गावर नेऊन सोड. आणि पुढच्या वर्षी मला "बाप्पा... हसू कि रडू?" असं लिहावंसं न वाटता "बाप्पा... हसूच हसू" असं वाटायला पाहिजे.
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यान कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
गणपती बाप्पा मोरया!!!
कॉलेजचा प्रवेश असो, घराचं बांधकाम असो, पाऊस असो कि निवडणूका असोत. सगळ्याचीच वेळ बदलली आहे. ऑगस्ट मध्ये कॉलेज सुरू कि लगेच ऑक्टोबर मध्ये submissions! अधला-मधला वेळ असाच welcome party वगैरे मध्ये गेलेला.... पाऊस पण जून मध्ये दडी मारतो नि आता बघताच आहात कि तुम्ही यायची वेळ झाली तरी कसा बिनदिक्कत बदाबदा कोसळतोय. लोक तर निवडणूक या प्रकाराला इतके सरावले आहेत कि जणू शाळेतल्या वर्गात सेक्रेटरी निवडावा. :( सगळं आबादी आबाद आहे बाप्पा!
आंबेडकरांनी सांगितलं होतं कि सवलतींवर जगू नका, आज इथे सवलतीशिवाय कोणी जगायला नको म्हणतोय. माणसांच्या शरीराची जाडी वाढतेय नि मनं संकुचित होत चालली आहेत. शिक्षणाने लोक उदात्त कमी झाले नि कोते जास्त. पंचविशीतला मुलं सरळ सांगतात कि "माझं आई-बाबांशी पटत नाही", अरे पण हा विचार करायला याला समर्थ कोणी केला? लहानपणी जास्त त्रास देतो म्हणून तुला सोडलं का आई-बाबांनी??
सगळं जीवनच व्यस्त झालंय... पैसे जास्त-वेळ कमी, घर मोठं-माणसं कमी, शरीर मोठं-कपडे कमी, देखावा जास्त-आपलेपणा कमी, झोप जास्त-स्वप्न कमी, नेते जास्त-आदर्श कमी, चोरी जास्त-निर्मिती कमी! चेहरा खराब झाला तर निरनिराळे लेप लावून स्वच्छ करतात..पण आमच्या मनावरच्या जळमटांचं काय? बाप्पा... मनासाठी एखादं parlour काढता येईल का? वयात येणार्या मुला-मुलींना आहार नियमांबरोबर विचार नियम किती जण समजावून देत असतील?
आजच वर्तमानपत्रात तुमचं अगदी वाजत-गाजत स्वागत झाल्याची सचित्र बातमी वाचली.... पण जरा शेजारी नजर जाते तर अमेरिकेने अणुकरारात केलेली दिशाभूल दिसली. विद्यमान सरकारने स्वत:ची तोंड लपवण्यासाठी केलेला विश्वासघात दिसला. एका आडरानात दरोडेखोरांनी महिलांवर केलेला अत्यचार दिसला. "एक लाखात कार" प्रकल्पाच्या अजून नवीन बातम्या वाचल्या. बिहार मधील लोकांचे हाल दिसले... विदर्भात पाणी नाही म्हणून माणूस मरतोय आणि बिहार मध्ये पाणी आलं म्हणून माणूस मरतोय! पाणी म्हणजे जीवन ना रे... मग जीवन सुद्धा अति झालं कि त्रासच होतोय!
तू म्हणशील काय आज वर्षानी आलो तर मला काही माहित नसल्यासारखं सगळं सांगते आहेस. तुलाच सगळं माहित आहे रे... तूच कर्ता आणि करविता! पण सगळंच इतकं दाहक नको ना करूस. माणूस चुकला...चुकतो आहे. पण तू त्याला योग्य त्या मार्गावर लवकरात लवकर आण.
आता म्हणशील इतकं काही वाईत नाहीये ....ते पण खरंच आहे. वर सांगितलेल्या सगळ्या परिस्थीतीतच प्रकाश-मंदा आमटे आहेत, अभिनव बिंद्रा आहे, भारतीय त्रिदल सेना आहे. पण महाभारताप्रमाणेच सुष्ट आणि दुष्ट हे व्यस्त प्रमाणात आहेत. मान्य आहे रे हे सगळं आमच्यामुळेच... पण तू आला आहेस तोवर मन मोकळं करून घेतलं. दहा दिवसात तू बघशीलच सगळं.... मग पुढच्या वर्षी येताना हे कमी करण्याच्या योजना घेऊनच ये. यंदा जाता जाता शक्य तितक्या लोकांना सुष्ट व्हायच्या मार्गावर नेऊन सोड. आणि पुढच्या वर्षी मला "बाप्पा... हसू कि रडू?" असं लिहावंसं न वाटता "बाप्पा... हसूच हसू" असं वाटायला पाहिजे.
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यान कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
गणपती बाप्पा मोरया!!!
Monday, September 01, 2008
बालीश बोल
परवा रविवारी दुपारी चार च्या सुमारास अचानक अंधारून आलं नि ४:३० च्या सुमारास एकदम धो-धो पाऊस पडायला लागला. गणपती बाप्पाचे आगमन अगदी २ दिवसावर आले असल्याने अनेक लोकांप्रमाणे आम्हालाही गणपतीच्या आरासीचं सामान आणायचं होतं. पण पाऊस काही थांबायचं नाव काढेना.... माझा भाचा (वय- सौव्वा ३ वर्ष) सारखा विचारत होता कि कधी जायचं बाप्पाचं सामान आणायला.... शेवटी अगदी वैतागून त्याने आबांना (आजोबा) विचारलं
"ए आबा, पाऊस का रे पडतो??"
"अरे, पाऊस हवा आहे सगळ्यांना"
"पण का??"
"पाऊस नसेल तर पिक.... (इथे आबांच्या लक्षात आलं कि नातवाला पिक वगैरे झेपणार नाही) आपण कपडे कसे धुणार??"
"पण कपडे का धुवायचे?"
"ते खराब होतात, मळतात ना! मग धुवावे लागतात...आपण धुतो कि नाही रोज"
"अले(अरे), पण मग त्यासाठी पाऊस कशाला? आपल्या मशिन (वॉशिंग) ला पाणी आहे कि..."
हे ऐकून आबा आणि मी खो खो हसत होतो...
"ए आबा, पाऊस का रे पडतो??"
"अरे, पाऊस हवा आहे सगळ्यांना"
"पण का??"
"पाऊस नसेल तर पिक.... (इथे आबांच्या लक्षात आलं कि नातवाला पिक वगैरे झेपणार नाही) आपण कपडे कसे धुणार??"
"पण कपडे का धुवायचे?"
"ते खराब होतात, मळतात ना! मग धुवावे लागतात...आपण धुतो कि नाही रोज"
"अले(अरे), पण मग त्यासाठी पाऊस कशाला? आपल्या मशिन (वॉशिंग) ला पाणी आहे कि..."
हे ऐकून आबा आणि मी खो खो हसत होतो...
Tuesday, July 29, 2008
Corporate दुखवटा
नवीन(??) आर्थिक वर्ष चालू होऊन आता ते जुनं व्हायची वेळ आली.... मार्च मध्ये सुरू झालेली appraisal cycle मे पहिल्या आठवड्यात उरकली गेली. त्यात मिळालेलं rating बघून २५% लोक आधीच नाराज होते...उरलेले काही माझ्यासारखे आशावादी अजूनही उरला सुरला उत्साह टिकवून होते. दरम्यान Infy, CTS, Capgemini, IBM वगैरे बड्या कंपन्यांमध्ये पगारवाढ जाहीर होत होती. $ घसरण्याच्या निमित्ताला सगळ्या कंपन्या टेकलेल्या होत्या, management, HR सगळी लोकं आपापली गाजरं अगदी होलसेल भावात विकायला बसली होती.... Onsite चे कमीतकमी chances, बढती नाही वगैरे वगैरे नेहमीच आहे..यंदा भर पडली ती एक अंकी पगारवाढीची!
शेअर मार्केटने पण अशी काही मान टाकली कि नकोच ते चढ-उतार track करणं, तो portfolio बघणं असं वाटू लागलं. पेट्रोल महाग झालं, पर्यायाने सगळ्याच वस्तू महाग झाल्या. Inflation 11% च्या वर गेलं. याच सगळ्या गोंधळात मध्ये मी एका investment plans ची माहिती देणार्या माणसावर पण चिडले :)
मे मध्ये पगारवाढीची पत्रं मिळतील ही आमच्या सारख्या लोकांची साधी आशा आमच्या कंपनीने अगदी धुळीला मिळवली. मग नुसत्या अफ़वा....लोक वाट्टेल ते बोलत होते. बस मध्ये, canteen मध्ये सगळीकडे आडून आडून याच गोष्टीची चर्चा! कंपनी अधिकृतरित्या काही सांगत नव्हती आणि लोक इकडे हवालदिल झाले होते.करता करता शेवटी जून च्या शेवटी एक e-mail आली ज्यात आम्हाला जुलै मध्ये पगारवाढीची पत्रं मिळतील असं म्हणलं होतं.... चला! परिस्थिती अगदीच वाईट नव्हती तर!!!
जुलै सुरू झाला. काहीतरी जबरदस्त suspense असावा अशा थाटात कंपनीने अगदी २८ ला सकाळी ई-पत्रं पाठवली. सगळा फ़ुगा फुटला होता. इकडे पण बहुतांश लोकांना एक अंकी पगारवाढ आहे. Inflation 11% आणि पगारवाढ एक अंकी! बहुत नाइन्साफी है! salary restructure करून उगाचंच एक खोटं मानसिक समाधान दिलंय. कालपासून बरेच लोक नाराजी व्यक्त करत आहेत. बाहेर पडायचं कि अजून एक वर्ष इथे काढायचं अशा चर्चा आता रंगत आहेत. पण एकूण चित्र दुखवट्याचं आहे. इतर सगळ्या दुखवट्याप्रमाणे हा पण १०-१२ दिवसावर काही टिकत नाही. लोक सरावतात.... न सरावून पर्याय नसतो.
तुम्ही अनुभवला असेलच असाच एखादा Corporate दुखवटा!
शेअर मार्केटने पण अशी काही मान टाकली कि नकोच ते चढ-उतार track करणं, तो portfolio बघणं असं वाटू लागलं. पेट्रोल महाग झालं, पर्यायाने सगळ्याच वस्तू महाग झाल्या. Inflation 11% च्या वर गेलं. याच सगळ्या गोंधळात मध्ये मी एका investment plans ची माहिती देणार्या माणसावर पण चिडले :)
मे मध्ये पगारवाढीची पत्रं मिळतील ही आमच्या सारख्या लोकांची साधी आशा आमच्या कंपनीने अगदी धुळीला मिळवली. मग नुसत्या अफ़वा....लोक वाट्टेल ते बोलत होते. बस मध्ये, canteen मध्ये सगळीकडे आडून आडून याच गोष्टीची चर्चा! कंपनी अधिकृतरित्या काही सांगत नव्हती आणि लोक इकडे हवालदिल झाले होते.करता करता शेवटी जून च्या शेवटी एक e-mail आली ज्यात आम्हाला जुलै मध्ये पगारवाढीची पत्रं मिळतील असं म्हणलं होतं.... चला! परिस्थिती अगदीच वाईट नव्हती तर!!!
जुलै सुरू झाला. काहीतरी जबरदस्त suspense असावा अशा थाटात कंपनीने अगदी २८ ला सकाळी ई-पत्रं पाठवली. सगळा फ़ुगा फुटला होता. इकडे पण बहुतांश लोकांना एक अंकी पगारवाढ आहे. Inflation 11% आणि पगारवाढ एक अंकी! बहुत नाइन्साफी है! salary restructure करून उगाचंच एक खोटं मानसिक समाधान दिलंय. कालपासून बरेच लोक नाराजी व्यक्त करत आहेत. बाहेर पडायचं कि अजून एक वर्ष इथे काढायचं अशा चर्चा आता रंगत आहेत. पण एकूण चित्र दुखवट्याचं आहे. इतर सगळ्या दुखवट्याप्रमाणे हा पण १०-१२ दिवसावर काही टिकत नाही. लोक सरावतात.... न सरावून पर्याय नसतो.
तुम्ही अनुभवला असेलच असाच एखादा Corporate दुखवटा!
Subscribe to:
Posts (Atom)