Friday, November 20, 2009

अपेक्षित....अनपेक्षित

"ए बाई, नको इतका negative विचार करूस" माझा एक मित्र मला कळकळीने सांगत होता.
"यात negative काहीही नाहिये, I am just preparing myself for the worst" मी त्याला शांतपणे सांगायचा प्रयत्न केला, पण डोळ्यात चुकार थेंब आलेच
"ते बघ...." मित्र
"काही नाही रे, I am OK" मी
"मग तसं मला पण वाटू दे that u r OK" तो

पण हे माझं नेहमीचं असतं. एखादी गोष्ट व्हावी म्हणून मी जितका प्रयत्न करते, तयारी करते; तेवढीच तयारी ते नाहीच झालं तर दुसरं काय करता येईल याची. एकाच गोष्टीची अपेक्षित आणि अनपेक्षित शक्यतांची तयारी करायची म्हणजे त्याने होणारा त्रास कमी होतो हा अनुभव. :) जसा त्रास कमी होतो तसाच होणारा आनंद ही कमीच होतो. पण मग ही त्या "preparing myself for the worst" ची किंमत असावी.

कधी कधी बरं वाटतं हे सगळं. जरा मोठे, शहाणे झाल्याचं समाधान(??) मिळतं. वाटतं, कि जमतंय आपल्याला परिस्थितीशी जुळवून घ्यायला. पण मग मनात जे सकारात्मक आहे ते अगदी तस्संच झाल्यावर काही वर्षांपूर्वी जसा निरागस आनंद व्हायचा तसा अनुभव आता फ़ारसा मिळत नाही. तेव्हा म्हणजे मी काहिही विचार न करता जगायचे तेव्हा. आला प्रसंग उत्स्फूर्त पणे जगायचे, न आधी विचार केलेला, न त्या क्षणी करणार आणि एकदा होऊन गेल्यावर तर बातच सोडा :)

अगदी छोट्या-छोट्या गोष्टीत आशा लावून धरायचे मी! छोटी म्हणजे किती छोटी असावी.... बाबा काही कामानिमित्त गावात गेलेत तर येताना त्यांनी ढोकळा आणावा. मग कधी विसरून त्यांनी नाही आणला कि मन हिरमुसायचं. "मला हवा होता" हे त्या वयातही मला बोलता आलं नाही, पण मनात धुसफुस व्हायची. असंच आई कधी कधी तिच्या बांगड्यांबरोबर माझ्यसाठी कानातंलं आणायची तेव्हा काय आनंद व्हायचा. चप्पल तुटली कि शिवून आणण्यापेक्षा नवीन घेऊ असं बाबा म्हणाले कि एकदम हवेत गेल्यासारखं व्हायचं. खरेदीला गेले अन पहिल्या १-२ दुकानात मनपसंत काही मिळलं नाही कि खट्टू व्हायचे.
"दिल है छोटासा, छोटीसी आशा..." असं अगदी.

१२ वी नंतर "preparing myself for the worst"(आपण याला PMFTW) ला सुरूवात झाली बहुतेक. मार्क धड ना चांगले, धड ना वाईट. ना आनंद होत होता ना वाईट वाटत होतं. इंजिनीरींग ला free seat मिळत नव्हती. payment ची बाबांची तयारी होती (म्हणजे त्यांना त्रास घेऊन ते करयाला तयार होते) पण "free seat ची लायकी नाही तर payment तरी कशाला" असं मी म्हणत होते. मग यातून च एक पर्याय पुढे आला तो BCS चा. Bachelor of Computer Science. मला admission मिळाली, पुढे MCS पण झाले. आणि खरोखरच कुठून तरी इंजिनीरींग करून त्यामानाने काहीच धड न करता आलेले बरेच जण मी आज बघते त्यापेक्षा आपलं चालू आहे ते बरंय.

तर जे हवंय ते मिळत नसेल, घडत नसेल तर पर्याय खुले ठेवता आले पाहिजेत आणि त्यातून अनेकदा चांगलच हाती लागतं हे जाणवलं.पुढे कधीतरी एकदा खूप निराश झाले होते, म्हणजे निराशेचं कारण मला बरंच अपेक्षित होतं, पण ते तसं घडलं तर आपण काय करायचं ह्याचा विचारच केला नव्हता. दर वेळी ती नकारत्मक शक्यता मन अमान्य करत राहिलं आणि ज्यादिवशी त्याला तोंड द्यायची वेळ आली तेव्हा गळून गेल्यासारखं झालं. खूप त्रास झाला, मनाने हिंदोळे, हेलकावे झेलले. एक शक्ती असावी कुठेतरी तसं मी अलगद त्या निरशेतून बाहेर आले.आणि तिथे PMFTW चा पहिला धडा मिळाला. नकारात्मक विचार टाळून उपयोग नाही तर त्यावर उपाय/ पर्याय शोधता आला पाहिजे.

आता सवय च झालीये. जवळ-जवळ सगळ्याचा दोन बाजुने विचार केला जातो, दोन दिशा दिसतात आणि मनाची एक तयारी असते कि यातला एक मार्ग आपल्याला घ्यायचा आहे.सकरात्मक असेल तरी मग हुरळून जाता येत नाही, कारण मार्ग चालू करायचा असतो आणि त्यात अडथळे नको म्हणून परत PMFTW ची तयारी :) नकारात्मक तोंड द्यायला तसं कठीण च असतं. दर वेळी जाणवतं, कि मी तयार आहे यासाठी असं आपल्याला फ़क्त वाटतं, पण तशी तयारी असतेच असं नाही. पण पर्यायाचा विचार झालेला असतो आणि तो पर्याय निवडताना निम्मा त्रास तुम्ही सहन केलेला असतो त्यामुळे आता प्रत्यक्ष तोंड देताना थोडा कमी त्रास :)कदाचित होणारा १००% त्रास ३०% आधी आणि ७०% नंतर असा विभागला जातो म्हणून असेल.

कोणाला वाटेल सगलं निरस होत असेल याने... इतका विचार करायची गरज आहे का? मी म्हणेन, तसं निरस नाही होत काहीच. ही सगळी विचार पद्धत इतकं अस्व्स्थ करते की तुम्ही सतत गुंतले जाता. कुठे काही नवीन मिळतंय का याचा शोध घेत रहता. खूप negativity चा विचार केल्यामुळे अगदी छोटी मनासारखी घटना पण मन सुखावून जाते. रोज च २५ -30traffic signal पार करून जाणार्याला एक दिवस अचानक त्यातले १५ traffic signal हिरवे मिळाले तर कसं होत असेल, अगदी तस्स! तयारी सगळ्या ३० signal ची ठेवा, कुठला लाल लागला तर काय करता येईल याचा विचार करून ठेवायचा. सगळेच हिरवे मिळाले तर सटासट पोचून काय करता येईल हे बघा.

अपेक्षित....अनपेक्षित! मस्त मजा आहे यात... जिंकायचं तर आहेच, पण एक पायरी हारले, घसरले तरी कसं जिंकता येईल हे ठरवायचं.