Wednesday, September 26, 2007

जल्लोष!!!

"ए स्नेहल, चलो अभि..." अंकुश
"हा, ये एक मेल डालके आती हू. तब तक अपना cricinfo है ना!!! " मी

मेल करून निघायला ५:२५ होऊन गेले.... वरती गेले तर canteen full. बाप रे!!! पटकन चहाचा कप उचलून मी एक बरी जागा शोधली. अंकुशपण दाबेली घेऊन आला. त्याच्यामागोमाग चेतना...त्रिकुट जमलं :) (आमच्याकडे जोश नावाची एक टिम आहे...जी आम्हाला दर शुक्रवारी एक सिनेमा आणि काहि महत्त्वाच्या मॅचेस दाखवते)

"अरे आज सेहवाग नही है" अंकुश
"हा..injured ना" मी
"युसुफ पठाण को लिया है. साले का नसीब देखो...debut match क्या भारी मिला उसे" अंकुश
"युसुफ पठाण कौन??" चेतना ने अक्कल पाजळली.
"अरे ढक्कन, इरफान का भाई. अब इरफान कौन मत पुछो" वैतागून अंकुश
"इरफान का भाई batsman कैसे??" परत चेतना
"क्युं...तेरी बेहेन कहा IT मै है?" अंकुश
"अरे ये सब किधर जा रहे है??" मी
"national anthem....यार मे क्यु २ लडकियों के साथ match देखने आया हू?" परत वैतागून अंकुश

इकडे match साठी जमलेल्या २००-३०० लोकांनी टाळ्या वाजवायला सुरूवात केली... राष्ट्रगीत सुरू झाले. सगळे एका क्षणात उभे राहिले. झाल्यावर "भारत माता कि जय!!!" चा जोरदार नारा. काहि लोक अजूनहि येतच होते.

गंभीर आणि युसुफ पठाण आले. इकडे टाळ्यांचा नुसता कडकडाट. निम्म्या लोकांना मॅच दिसतच नाही....मग मागचे लोक खुर्चीवर उभे वगैरे....
गंभीर पहिल्या बॉल साठी तयार...इकडे परत टाळ्या.... बॉल आला..... हलका पुश...आणि एक रन साठी पळायला सुरूवात. युसुफ पठाण जेमतेम पोचतो तोवर एकाने बेल्स उडवलेल्या..
"ओह्ह्ह्ह्ह्ह्ह" एक सामुहिक प्रतिकिया

आता रिप्ले चालू..... सगळ्यांना कळलं युसुफ पठाण आऊट नाही... परत टाळ्या!!! आता बसलेले लोक पण उभे राहू लागलेले.... अधून मधून शिट्ट्या वगैरे.... वातावरण मस्त तयार झालेलं. आमच्याइथे हे असं होतं तर तिकडे जोहान्सबर्ग ला काय असेल??? मग एक ४, मध्ये मध्ये सिंगल्स..... इकडे बॉल बॅटला लागला कि लगेच टाळ्या!!! असाच एक शॉट मारताना युसुफ पठाण चुकला....आणि आऊट झाला. त्याचा score १५...

"क्या है, १५ पे आऊट?" चेतना
"अबे, तू जब fresher थी, १५ lines का code भी लिखा था क्या पेहले दिन?" अंकुश
"ए, चुप रहो यार....पेहले ६ ओव्हर मे विकेट नही जाना चाहिये था" मी
"उथप्पा आया देख" अंकुश

परत जोरदार टाळ्या.....मॅच पुढे चालू....आता माझं लक्ष सारखं घड्याळाकडे. ६:१५ ला मला परत जायचं होतं. माझ्यापुढे इतके लोक उभे होते कि मला उभं राहूनदेखील umpire च्या टोपीशिवाय काहि दिसत नव्हतं. काय घडतंय हे बघायच्या नादातच कळलं...उथप्पा आऊट!!!! तेव्हा ६.१० झाले होते. मी माझ्या desk वर यायला निघाले.
desk वर येऊन बघितलं तर मीटींग अजून सुरू झाली नव्हती....लगेच cricinfo.com उघडलं... युवराज येऊन ५-७ मिनिटे झाली होती आणि त्याने अजून एकहि ६ मारली नव्हती...श्या....माझी मनातच चिडचिड. गंभीर मात्र चांगला खॆळत होता!!!

माझी मीटिंग चालू झाली.....अर्थात ग्राहक bowling करत होता आणि मी batting चा प्रयत्न. माझा कधी गंभीर होत होता, कधी युवराज!!! खेळ सगळा!!! :) मधून मधून वर कॅंटिन्मधल्या लोकांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. तेव्हडच जरा समाधान... माझं सोडा पण निदाम आपल्या cricketers ना तरी बॅटिंग जमत(??) होती तर...
मीटिंग संपली नि cricinfo वर टिचकी मारली.....आपली बॅटिंग झाली होती.....१५७/५ :(( score बघून मी निराश झाले....निदान १८० तरी हवे होते. pitch report चांगला होत!!! एकतर पाचवा bowler नाही...... जाऊ द्या झालं.

’ते’ batting साठी आले. वरून commom India अशी जोरदार आरोळी....पुढच्या २ च मिनिटात प्रचंड टाळ्या........बघते तर पहिली विकेट गेली होती......वा!!!! मला खरं तर वर जाऊन मॅच बघायची होती पण...माझ्या मीटिंगधल्या खेळाने काहि कामे माझ्या पदरात टाकली होती. ती करत बसणे भाग होते. काम सुरू केलं.... वरून काहि जोरात आवाज आला तरच स्कोर बघणं चालू होतं. इतक्यात अंकुश आला.... त्याने काहि ऑंखों देखा हाल संगितला...मी मनात चरफडत काम करत बसले होते. समाधान ते एक कि अंकुश पण काम करत बसला होता :)

सगळं झालं..ग्राहकाला शेवटची मेल केली....८:३३ झाले होते....माझी बस ८:४५ ला असते....आता वर जाऊन मॅच बघणं अशक्य होतं. मॅच मध्येहि प्रचंड tense situation होती...कधीहि काहिहि होऊ शकत होतं....त्यांनी एकाच ओव्हर मध्ये ३ सिक्स, १ फ़ोर असं काहि धुतलं होतं...... पण ८ विकेट पण गेल्या होत्या. बाप रे!!! ८:३८ झाले..... शेवटचे काहि बॉल बाकि आहेत.... काय करू? मॅच कि बस?? मॅच कि बस??? मॅच कि बस???? ...बस च....कारण नंतर २ तास थांबावं लागेल.

"ए अंकुश, मै जाती हू. मुझे फोन करना...ओके" मी

लिफ्टने खाली आले तो च वरून प्रचंड आवाज....माझा लगेच अंकुश ला फोन.
"क्या हुआ?"
"कुछ नही...वाईड गया."
"तो...इतना हंगामा????"
इतक्यात वरून मोठा आवाज, शिट्ट्या......
"अरे..शायद विकेट गयी" अंकुश
"शायद क्या देख के बता ना....."
"अरे....नेट पे आने मे टाईम लगता है ना!!!"

माझ्या समोरचा security guard टोपी उडवून नाचत होता. नववी विकेट गेली. मला मॅच सोडून आल्याचा पश्चाताप होत होता. बाहेर आले तर समोरच्या दुकानात TV बघणाऱ्यांची ही गर्दी!!! माझ्यासारखे मॅच सोडून आलेले फोनवरून कोणाकोणाशी बोलत होते..... सगळीकडेच एक तणाव.

अशीच फोनवर बोलत असलेली एक मुलगी ओरडली.."आऊट!!!!"..."क्या? सिक्स???? ओह नो!!!!!!!!!!!!!!!!!!!"
मला काहिच सुचत नव्हतं......धडधड धडधड धडधड!!!!

"आऊट!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! Yes................." परत मगाशीचीच मुलगी ओरडली.
समोरच्या दुकानातली लोकं पण नाचायला लागली......मागून वर आकाशात एक मोठा शोभेचा फटाका!!!

आपण जिंकलो!!!! T 20 चा पहिला world cup.... पाकिस्तानला हरवून आपण मिळवला!!!

बस आली....सगळे तेच बोलत होते.....चारी बाजूंनी फटाक्याचे आवाज. रस्ता मात्र एकदम मोकळा.....निम्म्या वेळात माझी बस SSPMS पर्यंत आली होती.... JM road वर तर काहि गणेश मंडळे ढोल ताशा च्या नादात नाचत होते. सगळीकडे नुसता उत्साह, आनंद!!! बघावा तो माणूस खुशीत दिसत होता. कर्वे रोड ला आले.....आता रस्त्यावर गर्दी होऊ लागली होती. काहि अति उत्साही (?) तरुण बाइकचा ताफा, झेंडे घेऊन रस्त्यावर ओरडत चालले होते.

एव्हाना गणपती बाप्पाने पण इतर देवांपर्यंत भारताची कामगिरी पोचवली असेल. कुठल्या देवाने धोनीशी संपर्क पण साधला असेल.

इकडे लगेच राज्यसरकारने आगरकर आणि रोहित शर्मा ला प्रत्येकि १० लाख रुपयांचं बक्षिस जाहीर केलं.....अजून कितीतरी कोटीचं बक्षिस संघाला ..... (कारगिल मध्ये आपल्या जवानांनी कामगिरी केली ती याहून कमी होती जणू!!!)

आपण जिंकलो....... मलापण आनंदच झाला.....मीही (मनातल्या मनात) नाचलेच!!! पण, पण ....... केवळ T 20 ला प्रसिध्दी मिळावी म्हणून किंवा मार्च २००७ मध्ये आपण लवकर बाहेर पडल्याने झालेलं नुकसान भरून काढावं असा business angle ठेवून.....काहि युक्त्य प्रयुक्यांनी भारत फ़ायनल पर्यंत पोचला असेल आणि आपण जिंकलो असू तर.....तर कसला जल्लोष??

Friday, September 14, 2007

अवघी गजबजली पुनवडी...



आले रे आले रे गणपती आले....

लोकमान्यांनी सुरू केलेला गणेशोत्सव आज या शहराच्या सामुहिक उर्जेचं केंद्रस्थान बनला आहे. मंडळ कार्यकर्ते खूप आधीपसून च या कामासाठी झटत असतात...पण माझ्यासारख्या लोकांना गणेशोत्सवाची चाहूल लागायला लागते ती राखीपौर्णिमेनंतर.... जिथे जिथे म्हणून आधी राखीचे स्टॉल होते तिथे तिथे शिवाय इतर अनेक ठिकाणी गणपतीच्या सुंदर सुंदर मूर्ती दिसू लागतात.... हजारो, लाखो!!!! मग बाजारात दिसू लागतं गणपती आरासाच्या वस्तू. झुरमुळ्या, चंदेरी-सोनेरी बॉल्स, थर्माकॉल ची मखर-मंदिर. गेल्या ५-६ वर्षात यात भर पडली त्या गणपतीसाठी सोन्या-चांदिच्या दागिन्यांची. मुकुटापासून मोदकापर्यंत सगळं चांदीचं.... यामुळे भक्तांचा काय अनुभव ते माहित नाही पण तमाम सराफ लोकांची मात्र ’चांदी’ झाली आहे.
मंडळाच्या कार्यकर्त्यांइतकेच गणेशोत्सवासाठी मेहनत घेणारे म्हणजे शाळेतील मुले.... मला इथे मराठी शाळेतील मुलं असं आवर्जून सांगावंस वाटतंय. निरनिराळ्या पथकाकरता ही १२-१५ वयोगटातील मुले महिना-दिड महिना सराव करतात. सगळी मेहनत बाप्पा ला या वर्षी करता निरोप देताना असा काहि दणका उडवून देण्यासाठी कि बाप्पाने पुढच्या वर्षी जास्त लवकर यावे.
१०-११ दिवस असे धामधुमीत जातात कि बघणार्याला वाटावं...हि सगळी सामान्य माणसं वर्षभर खातात तरी काय नि हि सगळी सकारात्मक उर्जा, शक्ती आणतात कुठून? पण हे सगळं आम्हाला परंपरेने दिलं आहे....असं नाहि झालं तर आश्चर्य आहे, असंच होतं यात काहिच नाहि.
१०-११ दिवस बाप्पा येतील.... आपल्यामध्ये असतील. परत त्यांचे त्यांनाहि व्याप आहेतच!!! मग पुढच्या वर्षी लवकर या असे सांगत आपण त्यांना वाजत-गाजत निरोप देउ. २ दिवस जरा मरगळ जाणवते..... मग चालू होते नवरात्राची धामधूम... पूर्वी घरोघरी होणारा भोंडला हा प्रकार आता सार्वजनिक मंडळात (च) होतो. जोडीला गर्बा, दांडिया आहेच. साडे तीन मुहूर्तापैकि दसरा येतो.... बाजारात प्रचंड उलाढाल होते. सगळेच जण काहिनाकाही खरेदी करतात. सरस्वतीपूजन होते.
द्सरा झाला कि लक्ष्मी रोड कपडे खरेदी साठी फुलून जातो. अगदी गरीबातला गरीब देखील काहितरी नवीन कपडा घेतोच. घरोघरी फराळ, फटाके.... लक्ष्मी पूजन!!! परंपरा बघा कशी, आधी गणपती पूजन, मग शक्ती पूजन, मग सरस्वती पूजन आणि नंतर लक्ष्मी पूजन. संपूर्ण शहर विद्युत रोषणाई ने लखलखीत होऊन जाते. संपूर्ण वर्षाची पुणेकरांची ’जान’, ’जिगर’ दिसतं ते याच काळात!!!
सगळे होता होईता २-३ महिने जातात.... इतके दिवस सजलेलं शहर अचानक थंडिमुळे शाल ओढून बसणार. पण हे २ महिने पुणे मस्त असतं. गजबजलेलं, धामधूमीचं.....

बोला रे...
गणपती बाप्पा मोरया!!!!

Wednesday, September 12, 2007

जगी सर्व सुखी असा कोण आहे?

सकाळी ऑफिसला जायला निघाले आणि वाटेत असतानाच माझ्या आधीच्या कंपनीतल्या एकाचा फोन आला..
"स्नेहल, सॉरी काल बॅटरी संपली म्हणून परत फोन नाही केला....."
"हो का? बरं, काय म्हणतोय प्रोजेक्ट? offshore ला पण घेऊन आलास का ते काम?"
"अगं, घेऊन तर आलोय, पण म्हणावं तसं कामच नाही. आता मॅनेजर म्हणतोय कि बेंगळूरला जा"
"वा!! मग??"
"मग काय?? बायको सोडेल मला.... लग्न झाल्यापसून स्थिरत्व नाही. आधी बेंगळूर मग ऑस्ट्रेलिया..आता जरा पुण्यात घेतलेल्या घरात राहिन म्हणतो तर परत बेंगळूर!!!"
"पण मग पडा कि बाहेर....काय पण ते फ़ेविकॉल वाल्या खुर्ची वर बसल्यासारखं चिकटून बसला आहेस"
"हो ना... तेच तर! तुझ्या कंपनी मध्ये असेल काहि तर सांग ना!!"
"अरे, सध्या तरी नाहिये काहि. पण सध्या ’त्या’ कंपनी मध्ये आहे. मला ऑफर आहे, पण पैसे, काम कशात काहि फरक नाही म्हणून नाहि जात आहे मी. तू बघ."
"हो, बघतो ना. इथे बसून काहि भलं होईल असं वाटत नाहीये. तुझं बरं झालं, वेळेत बाहेर पडलीस"
"बस का.... तुला ना लेका, हवं होतं तेव्हा onsite पाठवलं ते विसरलास का?"
"पण काय उपयोग? बायको नाही रमली ना तिकडे. मग काय??"
"हम्म्म, बरं मी सांगते कुठे काहि आहे असं कळलं तर "
"please यार. चल मग नंतर बोलूयात ३-४ दिवसांनी. आता जरा मॅनेजरला बेंगळूरला जात नाही अशी मेल मारतो."
"ओके. बाय"

-------------------------------------------------------------
ऑफिस मध्ये आले. पाचच मिनिटात एक मैत्रिण बोलायला आली. काहि कारणाने ती गेले २ आठवडे ऑफिसला आली नव्हती.
"हाय स्नेहल"
"हाय!! मी पाहिलं तुला...मॅनेजरच्या केबिन मध्ये"
"अग हो ना. कसा आहे ग तो" प्रचंड वैतागून ती सांगत होती.
"का? काय झालं?"
"मी म्हणाले रिलीज हवाय प्रोजेक्ट मधून.... तर सरळ नाही म्हणतो. मला म्हणे तुला हवी ती flexibility देतो.... उशीरा ये, लवकर जा...अगदीच जमत नसेल तर एखाद दिवस सुट्टी घे. पण रिलीज नाही."
"हम्म्म्म्म"
"असं कसं म्हणू शकतो हा? माझी कंडिशन त्याला सांगूनहि असा का वागतो हा? म्हणजे मी इतके दिवस चांगलं काम केलं हे चुकलंच का?"
"chill madam!!! किती चिडचिड करते आहेस? आपण जरा दुसरं काहि सुचतंय का बघू ना!! तू घरी पण बोल"
"अगं पण....मला नाहिच जमणार आहे इतक्या लांब यायला आता. आणि आहे ना गावात ऑफिस..मग?"
"हो हो....चल आता जेवायला जाऊ. तू जरा icecream वगैरे खा :) थंड होशील :))"

-------------------------------------------------------------

"हॅलो स्नेहल, xxxx बोलतोय."
"येस xxxx"
"ते आपलं मेट्रिक्स शीट आहे ना... त्यात जरा चेंजेस करायचे आहेत"
"म्हणजे परत manipulation??"
"नाही नाही....आधीचं manipulation काढून टाकायचं. realistic data ठेवायचा. so delete that manipualed row, and send it across"
"ok. But was there any utilization issue raised"
"we will discuss it later. For now, change it and send, ok?"
"yes"

मी काहिशी चिडून excel sheet modify करायला घेते. मागच्या आठवड्यात जेव्हा मी xxxx ला म्हणाले होते कि इतकं manipulation नको... तर मला म्हणे "we should show it at least near to 95% though not 100%"
आणि म्हणून मी तेव्हा modify केलं... आज आता ते काढा... इकडे ग्राहकाने पण काम देऊन ठेवलंय, ते पण करा :(( भगवान उठा ले रे बाबा. मेरे को नहिं.....

-------------------------------------------------------------

"ए स्नेहल, बिझी आहेस का?"
"का रे?"
"५ मिनिटं काम होतं जरा"
"बोल ना.."
"ते खराडी कुठे आलं?"
"इथून ५-६ कि.मी असेल. याच रोड ने सरळ पुढे जायचं आणि सोलापूर हायवे साठीच्या वळणाला उजवी कडे वळायचं. पण तुला का जायचंय तिकडे?"
"एका कंपनीत उद्या HR round आहे"
"पाटिल, किती offer घेणार आणि कितींना लटकवणार आहात? पुरे कि आता... तुझं ठरलं आहे म्हणालास ना? मग???"
"हो गं, पण जाऊन बघावं म्हणतो.... देत असतील जास्त पैसे तर बघू"
"काय हे!!!"

-------------------------------------------------------------

काल एकाच दिवसात घडलेल्या या घटना.... सगळयांनाच काहि ना काहि अजून हवंय.... अजून चांगलं!!! आहे त्यात कोणीच समाधानी नाही, सुखी नाही. प्रत्येकालाच वाटतंय कि मला जे मिळतंय ते कमी आहे वगैरे.... म्हणून मग चालू आहे रेस.... धावपळ!!!

हे प्रसंग खरं तर प्रातिनिधीक आहेत.... आपल्या प्रत्येकाच्या भोवती, भोवती कशाला...प्रत्येकाच्या बाबतीत थोड्याफार फरकाने असंच काहि घडत असतं. आपण सुख वस्तूत शोधायला जातो....जे चांगलं आहे ते मला मिळायलाच हवं असं काहिसं सगळ्यांनाच वाटतंय. त्या नादापायी सुख निसटून जातंय... व.पु. म्हणतात ना "सुख हे फुलपाखराप्रमाणे असतं. मागे धावलात तर उडून जातं, शांत बसलात तर अलगद हातावर येऊन बसतं"
आम्हाला हे कळतं...पण मग आजूबाजूचे धावताना बघितले कि आम्हाला पण पळावंस वाटतं.... आणि मग आम्ही पळतंच राहतो. खरंच..जगी सर्व सुखी असा कोण आहे???